मुंबई : सध्या महाराष्ट्रात ४५ वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य द्यावं लागेल. म्हणूनच १८ ते ४४ वयोगटाला तुर्त लस मिळणार नाही,” अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली.
महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार, मंत्रिमंडळ बैठकीत एकमत https://t.co/HYMJ3CBhWX
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
मोठा गाजावाजा करत केंद्र सरकारने १ मेपासून देशातील १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात करण्याची घोषणा केली होती. मात्र लसींच्या टंचाईमुळे या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरुवातीपासूनच अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले होते. दरम्यान, लसींच्या कमी पुरवठ्यामुळे आता राज्य सरकारने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोना- जवळपास 100 मृतदेह नदीत वाहून आले, युपी-बिहार हादरले, मृतदेहांनी गंगा झाली मैलीhttps://t.co/i1CzqqGVTY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
राजेश टोपे म्हणाले, “तुर्त महाराष्ट्रात १८-४४ वयोगटातील लसीकरण आपण स्थगित करत आहोत. सीरमचे प्रमुख आदर पुनावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी २० मे नंतर महाराष्ट्राला दर महिन्याला दीड कोटी डोसेस देऊ असं सांगितलंय. त्याची विगतवारी कशी करायची याबाबत ते लंडनहून भारतात आल्यावर निर्णय घेतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्रात कालपर्यंत 1 कोटी 88 लाख 21 हजार 485 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि.11 मे 2021 रोजी 3718 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 379933 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.#MahaVaccination pic.twitter.com/zMEA7UtsK9
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 12, 2021
कोरोनाविरोधातील लसीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे तूर्तास लसीकरण केले जाणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी सांगितले की, लसीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ या वयोगटातील नारगिकांचे लसीकरण तूर्त न करणााचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सध्या ज्या व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली आहेत त्यांना दुसरा डोस मिळणे आवश्यक आहे. त्याचे कारण म्हणजे दुसरा डोस न घेतल्यात पहिल्यांदा घेतलेल्या लसीची उपयुक्तता राहणार नाही. त्यामुळे याआधीच कोरोनाविरोधातील लसीचा पहिला डोस घेतलेल्यांचे लसीकरण करणे गजरेचे आहे.
राज्यात आज 46781 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 58805 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 4600196 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 546129 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.01% झाले आहे.#MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 12, 2021
दरम्यान, राज्यातील लॉकडाऊन हे १५ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय़ मंत्रिमंडळाने घेतल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले. लॉकडाऊन केल्यानंतर राज्यातील अॅक्टिव रुग्णांची संख्या घटली आहे. भारतातील सरासरी रुग्णवाढीपेक्षा महाराष्ट्रातील रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले आहे. राज्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काही दिवस वाढावा, असा कल मंत्रिमंडळाने दर्शवला. तसेच मुख्यमंत्र्याना सांगण्यात आले. आता याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्य राखीव पोलीस दलातील जवानांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय https://t.co/zqBTVYqmhZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021