अहिल्यानगर 16 जून (हिं.स.) : विद्यार्थी हा उद्याच्या भारताचे उज्वल भविष्य असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची व संस्काराची खरी गरज आहे. आपण सर्वजण २१ व्या शतकाकडे वाटचाल करीत असून विद्यार्थ्यांच्या जोरावर भारत देश महासत्ता नक्कीच बनेल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
बोरुडे मळा येथे माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या वतीने १०वी १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी आ. संग्राम जगताप, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी सभापती पुष्पा बोरुडे, माजी स्थायी समिती सभापती गणेश कवडे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, निखिल वारे, नितीन पुंड, मुकुल गंधे, उद्योजक प्रदीप नातू, भीमाशंकर लांडे, पारुलाथ ढोकळे, महेश लोंढे, धीरज बिडवे, मनीष आहुजा, डॉ. शंकर शेळके, बाबासाहेब शिंदे, अविनाश जाधव आदी उपस्थित होते.