Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नांदेडमध्ये शिवसैनिक शेतकऱ्याची भगव्या वस्त्रानेच गळफास घेऊन आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

नांदेडमध्ये शिवसैनिक शेतकऱ्याची भगव्या वस्त्रानेच गळफास घेऊन आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2021/11/02 at 1:37 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नांदेड : नांदेडमध्ये उत्तम कल्याणकर या शेतकऱ्याने बँक पीककर्ज देत नसल्याने गळफास घेत आत्महत्या केली. तो एक शिवसैनिक असल्याची माहिती आहे. शिवसैनिक असलेल्या या शेतकऱ्याने शिवसेनेचे प्रतीक असलेल्या भगव्या वस्त्राने गळफास घेत जीवन संपवलं. अडीच एकर जमीन असलेला हा शेतकरी नापिकी आणि कर्जबाजारी झाल्याने त्रस्त होता. मृत शेतकऱ्याच्या पत्नीने बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दिवाळीच्या तोंडावर ही आत्महत्येची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उत्तम कल्याणकर हा शेतकरी नांदेडमधील कंधार तालुक्यातील गोगदरी गावातील रहिवासी होता. बँक कर्ज देत नाही म्हणून जगणे असह्य झाल्याने या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. शिवसैनिक असलेल्या या शेतकऱ्याने शिवसेनेचे प्रतीक असलेल्या भगव्या वस्त्रानेच गळफास घेतला आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येतेय.

अवघी अडीच एकर जमीन असलेला हा शेतकरी नापिकी आणि कर्जबाजारी झाल्याने त्रस्त होता. त्यातच बँक वेगवेगळी कारणे दाखवत त्याला कर्ज देण्यास टाळाटाळ करत होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यामुळे तणावाखाली येऊन त्याने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मृत शेतकऱ्याच्या पत्नीने बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शेती सिंचनासाठी शाश्वत पाणीपुरवठा नाही किंवा अतिवृष्टी झाल्यानंतर कोणते नियोजन नसल्याचा परिणाम काय असतो. हे बीड जिल्ह्यातील गेल्या 10 महिन्यातील शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीवरुन लक्षात येते. जानेवारी ते 30 ऑक्टोबर दरम्यानच्या कालावधीत या जिल्ह्यातील 158 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. देशात गेल्यावर्षभरात शेतकरी आत्महत्या 18 टक्क्यांनी वाढल्या असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे.

धक्कादायक म्हणजे देशात महाराष्ट्रात तर सर्वाधिक आत्महत्या तर आहेतच पण चालू वर्षात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या बीड जिल्ह्यात का असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण, अतिवृष्टी दरम्यानच्या महिन्याभरात बीड जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या नुकसानीच्या खुणा या कायम राहणार आहेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #ShivSainik #farmer #Nanded #Suicide #strangulation #saffron #cloth, #नांदेड #शिवसैनिक #शेतकरी #भगव्या #वस्त्र #गळफास #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सिक्सर किंग युवराज सिंग पुन्हा दिसणार मैदानात
Next Article पीआय उदयसिंह पाटील निलंबीत, डीबी पथकाच्या प्रमुखासह आठजणांच्या बदलीची चर्चा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?