Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भटक्या कुत्र्यांवरील आदेशाला स्थगिती मागणीप्रकरणी निर्णय राखून ठेवला – सर्वोच्च न्यायालय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

भटक्या कुत्र्यांवरील आदेशाला स्थगिती मागणीप्रकरणी निर्णय राखून ठेवला – सर्वोच्च न्यायालय

admin
Last updated: 2025/08/14 at 6:15 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट – रस्त्यांवरून भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या 11 ऑगस्टच्या आदेशाला स्थगिती देण्याच्या मागणीवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या प्रत्येकाने याची जबाबदारी घ्यावी लागेल. ही समस्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे निर्माण झाल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने प्राणी जन्म नियंत्रण नियमांच्या अंमलबजावणीबाबत स्थानिक अधिकाऱ्यांची भूमिका विचारली. न्यायालयाने सांगितले की, संसद नियम बनवते, पण त्यांचे पालन होत नाही. यामुळे मानव आणि प्राणी दोघांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

दिल्ली सरकारने न्यायालयात सांगितले की, रेबीज पसरवणाऱ्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे मुले मृत्युमुखी पडत आहेत, त्यामुळे हा प्रश्न वादग्रस्त न ठेवता सोडवला पाहिजे. सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, नसबंदीमुळे रेबीज थांबत नाही आणि लसीकरण असूनही मुलांना धोका कायम आहे.

मेहता यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये देशभरात कुत्रा चावण्याची 37 लाख प्रकरणे नोंदवली गेली असून, रेबीजमुळे 305 मृत्यू झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार ही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यांनी नमूद केले की, बहुसंख्य लोक शांतपणे हा त्रास सहन करत आहेत, तर काहीजण वेगळी भूमिका मांडत आहेत.

दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. त्यांनी 11 ऑगस्टच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली, ज्यामध्ये दिल्ली-एनसीआरमधील सर्व भटक्या कुत्र्यांना त्वरित पकडून आश्रयस्थानी हलवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

You Might Also Like

चर्चेनंतर युद्ध थांबवले नाही तर रशियाला गंभीर परिणाम – ट्रम्प

सर्वोच्च न्यायालयातर्फे माजी न्यायाधीश एल. नागेश्वर राव यांची बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल म्हणून नियुक्ती

संजय राऊत यांनी वारकरी, धारकरी, नाथ संप्रदायाची माफी मागावी – नवनाथ बन

जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवाड येथे ढगफुटी; 10 जणांचा मृत्यू

वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील इमारती व सदनिकांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चर्चेनंतर युद्ध थांबवले नाही तर रशियाला गंभीर परिणाम – ट्रम्प
Next Article प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगेंची लातूरमध्ये सदिच्छा भेट

Latest News

कठोर परिश्रम केल्यास जग भारताचं ऐकेल – नितीन गडकरी
महाराष्ट्र August 14, 2025
प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगेंची लातूरमध्ये सदिच्छा भेट
महाराष्ट्र August 14, 2025
चर्चेनंतर युद्ध थांबवले नाही तर रशियाला गंभीर परिणाम – ट्रम्प
देश - विदेश August 14, 2025
सर्वोच्च न्यायालयातर्फे माजी न्यायाधीश एल. नागेश्वर राव यांची बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल म्हणून नियुक्ती
देश - विदेश August 14, 2025
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी औजार लॉटरीचा कार्यक्रम संपन्न
सोलापूर August 14, 2025
संजय राऊत यांनी वारकरी, धारकरी, नाथ संप्रदायाची माफी मागावी – नवनाथ बन
देश - विदेश August 14, 2025
सोलापूर जिल्ह्यातील ३२ हजार शेतकऱ्यांना ४० कोटींची भरपाई
सोलापूर August 14, 2025
crime
सोलापूरातील नवीपेठ दवाखाना सील; अनधिकृत गर्भलिंग चाचणीचा संशय
सोलापूर August 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?