Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आर्य समाजाचे प्रख्यात नेते स्वामी अग्निवेश यांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

आर्य समाजाचे प्रख्यात नेते स्वामी अग्निवेश यांचे निधन

Surajya Digital
Last updated: 2020/09/11 at 10:03 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : आर्य समाजाचे प्रख्यात नेते स्वामी अग्निवेश यांचे निधन झाले. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आर्य समाज नेते स्वामी अग्निवेश यांना दिल्लीतील आयएलबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अवयव निकामी झाल्याने ते मंगळवारपासून व्हेंटिलेटरवर होते.

स्वामी अग्निवेश यांच्या शरीरातील अनेक अंगांनी काम करणे बंद केले होते. मंगळवारपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून होते. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता त्यांना कार्डियक अरेस्ट आला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र सायंकाळी 6.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती रुग्णालयाने दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान, त्यांच्या फेसबुक पेजवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. स्वामी अग्निवेश यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी नवी दिल्लीतील 7 जंतर मंतर येथील कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. गुरूग्राम जिल्ह्यातील बहालप येथील अग्निलोक आश्रमात सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर वैदिक पद्धतीने अंत्यसंस्कार केली जातील.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून स्वामी अग्निवेश यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

* राजकीय कारकीर्द

21 सप्टेंबरमध्ये, 1939 ला स्वामी अग्निवेश यांचा जन्म झाला. 1970 मध्ये त्यांनी ‘आर्य सभा’ नावाचा राजकीय पक्ष बनवला. 1977 मध्ये ते विधानसभेवर निवडून आले आणि हरयाणा सरकारमध्ये त्यांनी शिक्षणमंत्रिपदही भूषवले. तसेच 1981 ला त्यांनी ‘बंधुआ मुक्ति मोर्चा’ नावाच्या संघटनेची स्थापना केली. 2011 ला त्यांनी अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच ते ‘बिग बॉस’च्या घरातही काही दिवस राहिले होते.

You Might Also Like

राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट

चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे

शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी

जम्मू-काश्मीर: कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

TAGGED: #आर्यसमाज #प्रख्यातनेते #स्वामीअग्निवेश #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मी फार संयमी, घरची धुणी रस्त्यावर कधीच धूत नाही; फडणवीसांनी खडसेंच्या आरोपावर मौन सोडले
Next Article मराठा समाजाच्या न्याय हकासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?