Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तब्बल वीस गावच्या सरपंचांनी केली उपमुख्यमंञ्यांकडे तहसीलदाराच्या बदलीची मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

तब्बल वीस गावच्या सरपंचांनी केली उपमुख्यमंञ्यांकडे तहसीलदाराच्या बदलीची मागणी

Surajya Digital
Last updated: 2020/07/22 at 12:52 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

भंडारकवठे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे नुकतेच नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू झाले आणि अप्पर तहसीलदार म्हणून उज्वला सोरटे यांची नियुक्ती झाली. नियुक्ती होऊन अजून १ वर्ष पूर्ण झाले नसताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीपैकी २० गावच्या  सरपंचांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे बदली करण्याची मागणी केली आहे.

२० गावांच्या निवेदनामध्ये सरपंचांनी मंद्रूपचे अप्पर तहसीलदार उज्वला सोरटे यांनी ग्रामपंचायत हद्दीमध्ये शासनाचे कामे करत असताना शेतकऱ्यांचे पाणंद,अंतर्गत रस्ते मजबुतीकरण,स्मशानभूमी मुरमीकरण करणे, तसेच गावातील शेतक-यांचे क्षेत्रातील बांध बदिस्त करण्यासाठी खाजगी शेत जमिनीतून मालकांच्या संमतीने मुरूम उपसा करण्यासाठी शासनाची  रॉयल्टी भरून घ्या, अशी मागणी केली असताना देखील ती भरून घेतले जात नाहीत. चौकशीचा बहाणा करून तलाठी- सर्कल यांना पाठवून शेतकऱ्यांवर कारवाईची भीती घालणे, चालू असलेली कामे बंद करणे, फोटो व व्हिडिओ शुटिंग काढून शेतक-यांना बोलवून तहसीलदार हे तडजोड केली जाते, तडजोडीनंतर तोंडी कामे करण्यास परवानगी दिली जाते तर अशा अनेक समस्या शेतक-यांना येत असल्याने मंद्रुप अपर तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांची बदली करण्याची मागणी केली आहे.

तसेच ठेकेदार यांनी सुद्धा मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार उज्वला सोरटे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी शासकीय कामे करत असताना शासनाने रॉयल्टी अगोदरच घेतलेले असते परंतु उज्ज्वला सरवटे हे काम चालू होण्याच्या अगोदर ठेकेदाराकडून अगोदरच रोख स्वरूपात पैसे भरून घेतले जातात, पैसे न भरल्यास शासकीय कामे करताना अडथळा आणले जाते. त्यामुळे ठेकेदाराचे आर्थिक नुकसान होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

*  या वीस गावांनी दिले निवेदन

– भंडारकवठे, कंदलगाव, गुंजेगाव, अकोले मंद्रूप, मनगोळी, तेलगाव(भिमा) येळेगाव, विंचूर, सादेपूर, लवंगी, माळकवठे,कुरघोट, टाकळी, बरुर, कुडल -संगम, चिंचपूर, बाळगी, सादेपुर, गावडेवाडी, हत्तरसंग आदी गावांच्या सरपंचांनी लेखी निवेदन उपमुख्यमंत्र्यांकडे दिले आहे.

 

“तहसीलदार यांच्याकडे कामानिमित्त गेलेल्या शेतक-यांना माझा वशिला मोठा आहे, हे कोणी माझे काही करु शकत नाही, असे म्हणतात.  त्यामुळे त्यांच्याकडे गेलेला शेतकरी हा घाबरतो, अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांची कामे होत नसतील तर अशा भ्रष्ट अधिका-याला पदावर राहाण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या तहसीलदाराची बदली करावी, अन्यथा लॉकडाऊननंतर मंद्रूप तेरामैल  महामार्गावर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल”    – सुभाष पाटील, (अध्यक्ष, राष्ट्रवादी दक्षिण सोलापूर)

या सर्व बाबतीत त्यांची बाजू ऐकूण घेण्यासाठी दक्षिण सोलापूर मंद्रूप अपर तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. यावर त्यांनी या विषयावर काही बोलायचे नाही, असे ‘सुराज्य डिजिटल’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #मंद्रुप #तहसीलदार #बदली #मुख्यमंञी #वीसगावचेसपंच #निवेदन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कंटेनमेंट झोनमध्ये कर्मचा-यास मारहाण; पिता – पुञ दोघांना अटक
Next Article मार्डीनंतर नान्नज ठरले हॉटस्पॉट; उत्तर सोलापूर तालुक्याची एकूण रुग्णसंख्या १७१

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?