Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तब्बल वीस गावच्या सरपंचांनी केली उपमुख्यमंञ्यांकडे तहसीलदाराच्या बदलीची मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

तब्बल वीस गावच्या सरपंचांनी केली उपमुख्यमंञ्यांकडे तहसीलदाराच्या बदलीची मागणी

Surajya Digital
Last updated: 2020/07/22 at 12:52 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

भंडारकवठे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे नुकतेच नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू झाले आणि अप्पर तहसीलदार म्हणून उज्वला सोरटे यांची नियुक्ती झाली. नियुक्ती होऊन अजून १ वर्ष पूर्ण झाले नसताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीपैकी २० गावच्या  सरपंचांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे बदली करण्याची मागणी केली आहे.

२० गावांच्या निवेदनामध्ये सरपंचांनी मंद्रूपचे अप्पर तहसीलदार उज्वला सोरटे यांनी ग्रामपंचायत हद्दीमध्ये शासनाचे कामे करत असताना शेतकऱ्यांचे पाणंद,अंतर्गत रस्ते मजबुतीकरण,स्मशानभूमी मुरमीकरण करणे, तसेच गावातील शेतक-यांचे क्षेत्रातील बांध बदिस्त करण्यासाठी खाजगी शेत जमिनीतून मालकांच्या संमतीने मुरूम उपसा करण्यासाठी शासनाची  रॉयल्टी भरून घ्या, अशी मागणी केली असताना देखील ती भरून घेतले जात नाहीत. चौकशीचा बहाणा करून तलाठी- सर्कल यांना पाठवून शेतकऱ्यांवर कारवाईची भीती घालणे, चालू असलेली कामे बंद करणे, फोटो व व्हिडिओ शुटिंग काढून शेतक-यांना बोलवून तहसीलदार हे तडजोड केली जाते, तडजोडीनंतर तोंडी कामे करण्यास परवानगी दिली जाते तर अशा अनेक समस्या शेतक-यांना येत असल्याने मंद्रुप अपर तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांची बदली करण्याची मागणी केली आहे.

तसेच ठेकेदार यांनी सुद्धा मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार उज्वला सोरटे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी शासकीय कामे करत असताना शासनाने रॉयल्टी अगोदरच घेतलेले असते परंतु उज्ज्वला सरवटे हे काम चालू होण्याच्या अगोदर ठेकेदाराकडून अगोदरच रोख स्वरूपात पैसे भरून घेतले जातात, पैसे न भरल्यास शासकीय कामे करताना अडथळा आणले जाते. त्यामुळे ठेकेदाराचे आर्थिक नुकसान होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

*  या वीस गावांनी दिले निवेदन

– भंडारकवठे, कंदलगाव, गुंजेगाव, अकोले मंद्रूप, मनगोळी, तेलगाव(भिमा) येळेगाव, विंचूर, सादेपूर, लवंगी, माळकवठे,कुरघोट, टाकळी, बरुर, कुडल -संगम, चिंचपूर, बाळगी, सादेपुर, गावडेवाडी, हत्तरसंग आदी गावांच्या सरपंचांनी लेखी निवेदन उपमुख्यमंत्र्यांकडे दिले आहे.

 

“तहसीलदार यांच्याकडे कामानिमित्त गेलेल्या शेतक-यांना माझा वशिला मोठा आहे, हे कोणी माझे काही करु शकत नाही, असे म्हणतात.  त्यामुळे त्यांच्याकडे गेलेला शेतकरी हा घाबरतो, अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांची कामे होत नसतील तर अशा भ्रष्ट अधिका-याला पदावर राहाण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या तहसीलदाराची बदली करावी, अन्यथा लॉकडाऊननंतर मंद्रूप तेरामैल  महामार्गावर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल”    – सुभाष पाटील, (अध्यक्ष, राष्ट्रवादी दक्षिण सोलापूर)

या सर्व बाबतीत त्यांची बाजू ऐकूण घेण्यासाठी दक्षिण सोलापूर मंद्रूप अपर तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. यावर त्यांनी या विषयावर काही बोलायचे नाही, असे ‘सुराज्य डिजिटल’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

You Might Also Like

राजकीय विश्लेषक राजा माने यांना ‘शांतीदूत’ राज्यस्तरीय पुरस्कार

सोलापूर सीईओ जंगम यांनी शिक्षणाधिकार्यांवर चिडून सभागृह सोडले

भीमा नदीच्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

उजनी धरणाचा विसर्ग घटल्याने पंढरपूरमधील पुरधोका टाळता आला

सोलापूर जिल्ह्यात ४१५४ सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी; “एक गाव-एक गणपती” चालना

TAGGED: #मंद्रुप #तहसीलदार #बदली #मुख्यमंञी #वीसगावचेसपंच #निवेदन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कंटेनमेंट झोनमध्ये कर्मचा-यास मारहाण; पिता – पुञ दोघांना अटक
Next Article मार्डीनंतर नान्नज ठरले हॉटस्पॉट; उत्तर सोलापूर तालुक्याची एकूण रुग्णसंख्या १७१

Latest News

भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी
देश - विदेश August 24, 2025
फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना
देश - विदेश August 24, 2025
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते” – सुप्रिया सुळे यांचा वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र August 24, 2025
गणेशोत्सवासाठी कोकणकडे धावपळ; रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड गर्दी
महाराष्ट्र August 24, 2025
पूरपश्चात व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पाटील यांनी दिले निर्देश
महाराष्ट्र August 24, 2025
नांदेडमध्ये पूरग्रस्तांसाठी खासदार गोपछडे यांनी २० लाख रुपयांची मदत जाहीर
महाराष्ट्र August 24, 2025
पालकमंत्री पाटील यांनी पूरबाधितांसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले
महाराष्ट्र August 24, 2025
मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला आग; सर्व ४५ प्रवासी सुरक्षित बचावले
महाराष्ट्र August 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?