Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दररोज दीड लाख पुणेकरांना टँकरचा आधार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

दररोज दीड लाख पुणेकरांना टँकरचा आधार

admin
Last updated: 2025/04/27 at 3:28 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पुणे, 27 एप्रिल (हिं.स.)।

पुणे शहरात पाणीटंचाईची समस्या अधिक गडद झाली असून, दररोज सुमारे १.५ लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. महापालिकेची आठ टँकर भरणा केंद्रे असूनही, मागणीच्या तुलनेत पुरवठा तोकडा असल्याने अनेक भागांमध्ये नियमित पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. यात सर्वाधिक फटका नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांतील नागरिकांना बसत आहे, कारण या भागात स्वतंत्र आणि कार्यक्षम पाणीपुरवठा योजना अस्तित्वातच नाही. त्यामुळे या गावांंमध्ये दररोज महापालिकेकडून तब्बल १०५० टँकर पाणी दररोज दिले जाते.

शहरात वडगावशेरी, रामटेकडी, सासवडफाटा, धायरी, पटवर्धनबाग, पर्वती, पद्मावती आणि चतुःशृंगी येथे महापालिकेची आठ टँकर भरणा केंद्रे आहेत. या केंद्रांमधून दररोज सुमारे १४०० टँकर पाणी वितरित केले जाते. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी १०५० टँकर केवळ नव्याने समाविष्ट ३४ गावांसाठी पुरवले जातात. याउलट, जुन्या शहरातील नागरिकांसाठी केवळ ३५० टँकर पाणी उपलब्ध आहे. महापालिकेकडून हे पाणी मोफत दिले जात असले, तरी ते गरजूंसाठी पुरेसे नाही. याव्यतिरिक्त शहरात खासगी टँकर लॉबीदेखील सक्रिय आहे. दररोज २५० ते ३०० खासगी टँकर महापालिकेच्या केंद्रांवरून पाणी भरून नेतात आणि ते प्रति १० हजार लिटरसाठी १५०० ते २ हजार रुपयांना नागरिकांना विकले जातात. या टॅंकर फेऱ्यांची संख्या वर्षाला तब्बल ४ लाखांच्या वर आहे. त्यामुळे पुणेकरांना महापालिकेचे पाणी मिळत नसल्याने पदरमोड करून पाणी घ्यावे लागत आहे.

You Might Also Like

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

मोदी सरकारने ११ वर्षांत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली – प्रविण दरेकर

शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे

सरकारी योजनांचे दरवाजे ५५० भटके विमुक्तांना खुले

राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ट्रू बीम लिनियर ॲक्सलरेटर उपचार प्रणालीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Next Article प्रवेश शुल्कावर नियंत्रणासाठी कठोर नियमावलीची गरज

Latest News

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्र June 16, 2025
मोदी सरकारने ११ वर्षांत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली – प्रविण दरेकर
महाराष्ट्र June 16, 2025
शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 16, 2025
सरकारी योजनांचे दरवाजे ५५० भटके विमुक्तांना खुले
महाराष्ट्र June 16, 2025
विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयामध्ये करिअर करावे- आ. संग्राम जगताप
Top News June 16, 2025
राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे
महाराष्ट्र June 16, 2025
पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
देश - विदेश June 16, 2025
इराणमध्ये अडकले १५०० भारतीय विद्यार्थी, सरकार आणणार मायदेशी
देश - विदेश June 16, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?