Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेतून घेणार माघार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळ

टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेतून घेणार माघार

admin
Last updated: 2025/05/19 at 5:32 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 19 मे (हिं.स.)।भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणाव सुरु आहे. याचदरम्यान, बीसीसीआयने मोठा निर्णय घेतल्याचे समजते आहे. आगामी आशिया चषकातून टीम इंडिया माघार घेणार असल्याचं समोर आलं आहे.येत्या जूनमध्ये होणार असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ भाग घेणार नाही, असा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला आहे.याबाबत बीसीसीआयकडून लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या निर्णयानुसार, टीम इंडिया आगामी आशिया कपमध्ये सहभागी होणार नाही. पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या महिला इमर्जिंग आशिया कपवरही बीसीसीआय बहिष्कार टाकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बीसीसीआयने याबाबत आशियाई क्रिकेट परिषदेला देखील या निर्णयाची माहितीही दिली आहे. आशियाई क्रिकेट परिषदचे अध्यक्ष सध्या पाकिस्तानी मंत्री मोहसिन नक्वी आहेत, जे पीसीबीचे अध्यक्ष देखील आहेत.यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का देण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हा निर्णय भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. ”भारतीय संघ एसीसीने आयोजित केलेल्या आणि पाकिस्तानी मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील स्पर्धेत खेळू शकत नाही. ही देशाची भावना आहे. आम्ही आगामी महिला इमर्जिंग टीम्स आशिया कपमधून माघार घेतल्याबद्दल एसीसीला तोंडी कळवले आहे आणि त्यांच्या भविष्यातील स्पर्धांमधील आमचा सहभागही थांबवण्यात आला आहे, असे बीसीसीआयच्या सुत्राने म्हटले आहे.

बीसीसीआयच्या निर्णयामुळे सप्टेंबरमध्ये खेळवण्यात येणारी आशिया चषक स्पर्धा धोक्यात आली आहे. भारताव्यतिरिक्त, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ आशिया कपमध्ये खेळतात. महत्वाचे म्हणजे आशिया कप भारताने आयोजित केला होता. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकामुळे यंदाची ही स्पर्धा २०-२० स्वरुपात होणार होती. २०२३ नंतर ही स्पर्धा होत होती. या स्पर्धेचे बहुतांश प्रायोजक हे भारतीय आहेत. यामुळे ते देखील या स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता आहे. असे झाले तर ही स्पर्धाच रद्द होऊ शकते

You Might Also Like

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा विक्रमी १५० वा वनडे सामना

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राणा सोबत असतील तर, भाजपशी युती नकोच – आ. संजय खोडके
Next Article पाकिस्तानचा भंडाफोड करणाऱ्या संसदीय पथकासोबत जाण्यास युसूफ पठाणचा नकार

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?