Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवसेना व संभाजी ब्रिगेड यांची युती; संविधान टिकवण्यासाठी युती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

शिवसेना व संभाजी ब्रिगेड यांची युती; संविधान टिकवण्यासाठी युती

Surajya Digital
Last updated: 2022/08/26 at 5:34 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

मुंबई – संभाजी ब्रिगेडचे नेते आज उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह पत्रकार परिषद घेतली. पुढील काळामध्ये संभाजी ब्रिगेड व शिवसेना एकत्र काम करेल, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे. तसेच शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा झाली आहे. या एकीनं शिवप्रेमी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला मानणारी मंडळी आनंदी होईल. संविधान टिकवण्यासाठी ही युती झाली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. Alliance of Shiv Sena and Sambhaji Brigade; Alliance to Preserve the Constitution

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यापुढे युती म्हणून काम करणार असल्याचंही संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आलं. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे, अध्यक्ष मनोज आखरे, यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे. आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू.

ठाकरेंनी पुढं म्हटलं की, मला आपण एकत्र आल्याचा आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे. ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत. आम्ही सत्तेत होतो, सत्ता पुढे येणारच आहे. काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात. ही आपली वैचारिक युती झाली आहे. महाराष्ट्रात आज जे काही घडवलं किंवा बिघडवलं ती महाराष्ट्राची ओळख नाही. शिवरायांचा महाराष्ट्र आहे असं काही जण म्हणतात पण तसं वागत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. आमचं हिंदुत्व पटल्यानं संभाजी ब्रिगेड सोबत आली आहे. आपण दुहीच्या शापाला गाडून टाकू. संभाजी ब्रिगेडसोबत मतभिन्नता किती आहे यापेक्षा मतऐक्य किती आहे हे महत्वाचं आहे. दोन्ही पक्षांनी मतभिन्नता कुठं आहे यावर विचार करुन समन्वयानं काम करु, असंही ठाकरे म्हणाले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे. यालाच लोकशाही मानणारे लोकं आता बेतालपणे बोलत आहेत. कोर्टातील निर्णय हा देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील, याचा निर्णय असेल. आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असं ठाकरे म्हणाले.

 

मराठा सेवा संघाची युवक आघाडी म्हणून 1997 मध्ये संभाजी ब्रिगेडची स्थापना करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर हे त्यावेळी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता होते. याच काळात मराठा सेवा संघाकडून म्हणजे 1995 मध्ये शिवराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली. मात्र त्याला 20 वर्षात अपेक्षित यश मिळालं नाही. 5 जानेवारी 2004 रोजी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला करुन संभाजी ब्रिगेड प्रकाशझोतात आली. वादग्रस्त लेखक जेम्स लेनला भांडारकर संस्थेने चुकीची माहिती पुरवल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने भांडारकर संस्थेवर हल्ल्ला केला होता.

2012 साली संभाजी ब्रिगेडने रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडली. त्यावेळी देखील संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेत संघर्ष उभा राहिला. त्यावेळचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या पुढाकाराने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. आज त्याच शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेडची युती झालीय.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Alliance #ShivSena #SambhajiBrigade #Desai #Thackeray #preserve #constitution, #शिवसेना #संभाजीब्रिगेड #युती #संविधान #उद्धवठाकरे #देसाई
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राजाभाऊ सरवदेंची रिपाइंच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड
Next Article टीका करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी काँग्रेस सोडली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?