Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ठाकरे सरकारच्या संकटात आणखी वाढ; परमबीर सिंह थेट सुप्रीम कोर्टात पोहोचले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

ठाकरे सरकारच्या संकटात आणखी वाढ; परमबीर सिंह थेट सुप्रीम कोर्टात पोहोचले

Surajya Digital
Last updated: 2021/03/22 at 3:21 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी ठाकरे सरकारच्या संकटात आणखी वाढ होत असल्याचे दिसत आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे आता थेट सुप्रीम कोर्टात पोहोचले आहेत. परमबीर सिंह यांचे म्हणणे आहे की, त्यांनी जे आरोप लावले त्याची सीबीआयद्वारे चौकशी व्हायला पाहिजे. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही जप्त करुन त्याची चौकशी करावी म्हणजे तथ्य सर्वांसमोर येईल, असेही ते म्हणाले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांसंदर्भात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, अशी परमबीर सिंह यांची मागणी आहे. पुरावे नष्ट होण्याआधी या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी करण्यात यावी असं परमबीर यांनी म्हटलं आहे.

ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतही परमबीर यांची बाजू मांडणार आहेत. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे आणि सोशल सर्व्हिस ब्रांचचे एसीपी संजय पाटील यांना महिन्याला 100 कोटी रूपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं.याआधी 24-25 ऑगस्टला गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी अनिल देशमुख यांच्या गैरवर्तनाबद्दल पोलीस महासंचालकांना माहिती दिली होती, असं परमबीर यांनी म्हटलं आहे. पोलीस महासंचालकांनी ही माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना दिली. टेलिफोनिक इंटरसेप्शनच्या आधारे ही माहिती पुढे आली होती.

रश्मी शुक्ला यांच्या माहितीवर कारवाई न करता त्यांची बदली करण्यात आली. अनिल देशमुख अनेक गुन्ह्यांच्या प्रकरणात हस्तक्षेप करत होते. तपास त्यांच्या सांगण्याप्रमाणे होण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना सूचना देत होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अनिल देशमुख यांच वागणं त्यांच्या पदाचा गैरवापर आहे. अनिल देशमुख यांच्या गैरवर्तनाची सीबीआय चौकशी करावी असं परमबीर यांचं म्हणणं आहे. परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत अनिल देशमुख यांच्या गैरवर्तनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर 17 मार्चला परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आल्याचं त्यांनी याचिकेत नमूद केलंय.

परमबीर सिंह यांची बदली केल्यानंतर, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस अधिकाऱ्यांकडून अक्षम्य चुका झाल्याने सिंह यांची बदली केल्याचं वक्तव्य केलं होतं. परमबीर सिंह यांनी याचिकेत, माझी बदली द्वेषपूर्वक झाल्याचं म्हटलं आहे. “माझ्याविरोधात एकही पुरावा नसताना. चौकशीसाठी कोणाची नोटीस नसताना,” माझी बदली करण्यात आल्याचं परमबीर सिंह याचिकेत पुढे म्हणतात.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली असं पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

जवळपास आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली होती.

* ठाकरे सरकारचे संकट वाढण्याची शक्यता; कधीही होऊ शकते ED ची एन्ट्री

आधीच अनेक प्रकरणात अडचणीत सापडलेल्या ठाकरे सरकारचे संकट आणखी वाढणार असल्याचे दिसत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला 100 कोटी रुपये बार वाल्यांकडून वसुल करण्याचे आदेश दिले, असे पत्र परमबीर सिंह यांनी राज्यपालांना पाठवले. पैशांचे इतके मोठे गैरव्यवहाराचा आरोप झाल्याने या प्रकरणात ईडीची कोणत्याही क्षणी एन्ट्री होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सरकार मधील अनेकांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #Thackeray #government's #crisis #escalates #ParambirSingh #Supreme #Court, #ठाकरेसरकारच्या #संकटात #आणखीवाढ #परमबीरसिंह #थेट #सुप्रीमकोर्टात #पोहोचले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोनाचा कहर : नव्याने ४३, ८४६ नवे रुग्ण तर १९७ जणांचा बळी
Next Article केस सॉल्व करून सुपरकॉप बनण्याची वाझेची इच्छा; यामुळे हिरेनला मारण्याचा प्लॅन

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?