Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुबलक आणि स्वच्छ पाण्याचे ठाणेकरांचे स्वप्न लवकर होणार पूर्ण – विनोद पवार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मुबलक आणि स्वच्छ पाण्याचे ठाणेकरांचे स्वप्न लवकर होणार पूर्ण – विनोद पवार

admin
Last updated: 2025/03/23 at 9:49 AM
admin
Share
2 Min Read
SHARE

ठाणे, 23 मार्च (हिं.स.)। शहराला मुबकल आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल आणि ते कायम करत आलो आहेत. यापुढे ही करत राहणार असल्याचे उद्गार ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी जल दिनी बोलताना काढले. तसेच पाण्याची बचत आणि पाण्याची निर्मिती हीच काळाची गरज असल्याने ठाणेकर नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा, असे आवाहन ही त्यांनी यावेळी आहे.

ठाण्यात आयोजित केलेल्या जल दिनानिमित्त एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता पवार यांनी ठाणेकर नागरिकांना काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. पुढे बोलताना, पवार यांनी ठाणे महापालिकेची पाण्याची गरज ही ६१६ दशलक्ष लिटर इतकी आहे. मात्र, सद्यस्थितीत ५८५ दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आणि वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याची मागणी लक्षात घेता, पुढील २०५५ सालापर्यंत लागणाऱ्या पाण्यासाठी विविध स्रोतामार्फत पाणी पुरवठ्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा आणि जोरदार प्रयत्नही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या आशीर्वादाने महापालिका आयुक्त सौरभ राव च्या मार्गदर्शन मधे सुरू आहेत.

तसेच त्या प्रयत्नांना या काळात निश्चित यश येईल. असा विश्वास ही पवार बोलून दाखवला. त्यातच ठाणे शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. मात्र सद्यस्थितीत ठाणेकर नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा, असेही त्यांनी शेवटी बोलताना सांगितले. ह्या वेळी उपनगर अभियंता विकास ढोले, प्रदूषण नियंत्रण विभाग अधिकारी मनीषा प्रधान, कार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी, प्रशांत फिरके, हनुमंत पांडे, प्रशांत भुवड, शशिकांत साळुंखे सहित अन्य अभियंता व कर्मचारी आदि उपस्थित होते.

यावेळी पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जलकुंभाचे पूजन केले आणि अन्तराष्ट्रीय जल दिवस म्हणून पाणी पुरवठा विभागाने पाणी बचतीसाठी अधिकारी आणि कर्मचारी शपथ घेतली.

You Might Also Like

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री

कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

रायगड : पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ठाण्यात अतिक्रमण विभागाची कारवाई
Next Article बर्गर किंग इंडियाने देशभरात सुरू केली 500 हून अधिक रेस्टॉरंट्स

Latest News

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे
महाराष्ट्र August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?