Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सबसिडी बंद झाल्याने सर्वसामान्यांना गॅस परवडेना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सबसिडी बंद झाल्याने सर्वसामान्यांना गॅस परवडेना

admin
Last updated: 2025/04/08 at 1:34 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 8 एप्रिल (हिं.स.)

घरगुती गॅस सिलिंडरची सतत दरवाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता महागाईने त्रस्त झाली आहे. गॅस सिलिंडरचे वाढते दर सर्वसामान्यांना पेलवत नसल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी पुन्हा एकदा शेत, जंगलाची वाट धरली आहे. महिलांना उन्हातान्हात शेतात वणवण करत जळणासाठी सरपण मिळविण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असल्याने गोरगरिबांची पंचाईत झाली. त्याचबरोबर गॅसची सबसिडी बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातील महिला चुलीकडे वळत आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८५० रुपयांवर पोहोचली असून त्यात अतिरिक्त गाडीभाडे द्यावे लागत आहे. ग्रामीण भागातील हातावर पोट असणाऱ्या ग्रुप सर्वसामान्य गरिबांना, कष्टकरी महिलांना या सिलिंडर परवडत नसल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून पुन्हा चुलीकडे वळलेले दिसून येत आहे. पुन्हा सरपणाचा शोध, उसाची खोडवी, शेणाच्या गोवऱ्या, झाडांच्या वाळलेल्या फांद्या तोडून त्या रचून ठेवण्यामध्ये महिलावर्ग मग्न आहेत.

किमती आवाक्याबाहेर

१०० रुपयांत उज्ज्वला गॅसची जोडणी मिळत असल्याने सुरुवातीच्या काळात या योजनेला उत्तम प्रतिसादही मिळाला. परंतु, सिलिंडरच्या किमती दरवाढ आवाक्याबाहेर गेल्याने आपली चूलच बरी अशी भावना गरीब कुटुंबांतील महिलांची झाली आहे.

पैसे नसल्याने सिलिंडर घ्यायचे तरी कसे ?

उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर आणि शेगडी सरकारकडून मिळाली. परंतु, ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना एकदा संपलेले सिलिंडर पुन्हा घेण्यासाठी पैसेच नसल्याने त्यांना ते रिफिल करता येत नाही.

त्यातही सबसिडी बंद झाली आहे. त्यामुळे योजनेचा मूळ उद्देश बाजूला पडला आहे. गॅस सिलिंडर घेणे परवडत नसल्याने ग्रामीण भागातील जनता पुन्हा चुलींचा आधार घेत आहे.

सरपणासाठी महिला जंगलात भटकंती करत असल्याचे चित्र विशेषतः वाडी तांड्यावरील दुर्गम खेड्यापाड्यात पाहायला मिळत आहे.

You Might Also Like

‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू

रत्नागिरी : हिंदीची सक्ती न करण्याचे मनसेकडून शाळांना निवेदन

खा. नारायण राणे यांच्या निधीतून दिव्यांगांना वस्तूंचे वाटप

मोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – चंद्रकांत पाटील

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हगलूर येथील राणी जाधव यांच्यावर सावकारी गुन्हा दाखल
Next Article सर्वधर्म समभाव तोडणाऱ्यांना जनता जागा दाखवेल : यशोमती ठाकूर

Latest News

‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर
महाराष्ट्र June 19, 2025
इलॉन मस्क यांच्या स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या संशोधन केंद्रात स्फोट
देश - विदेश June 19, 2025
कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू
महाराष्ट्र June 19, 2025
रत्नागिरी : हिंदीची सक्ती न करण्याचे मनसेकडून शाळांना निवेदन
महाराष्ट्र June 19, 2025
खा. नारायण राणे यांच्या निधीतून दिव्यांगांना वस्तूंचे वाटप
महाराष्ट्र June 19, 2025
मोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 19, 2025
आषाढीवारी 2025 – मानाच्या पालख्या, वारकरी अन् भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट
महाराष्ट्र June 19, 2025
क्रोएशियाच्या पंतप्रधानांकडून मोदींना संस्कृत व्याकरण पुस्तक भेट
देश - विदेश June 19, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?