Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारत- पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे आयपीएलचा चालू हंगाम स्थगित
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

भारत- पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे आयपीएलचा चालू हंगाम स्थगित

Surajya Digital
Last updated: 2025/05/09 at 4:52 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 9 मे (हिं.स.) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव पाहता बीसीसीआयने इंडियन प्रीमियम लीग चालू हंगाम स्थगित केला आहे.आज (९ मे ) झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.आजपासून आयपीएलचा कोणताही सामना होणार नाही. आता बीसीसीआयची पहिली प्राथमिकता परदेशी खेळाडूंना सुरक्षित त्यांच्या घरी पाठवण्याची आहे.

बीसीसीआय लवकरच आयपीएलच्या नवीन तारखा जाहीर करणार आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हंगामातील 58 वा सामना सुरू होता, पण सुरक्षेच्या कारणास्तव सामना थांबवून प्रेक्षकांना स्टेडियम रिकामे करण्यास सांगण्यात आले. अशा युद्धजन्य परिस्थितीत केंद्र सरकार, बीसीसीआय आणि सर्व फ्रँचायझी मालकांशी सल्लामसलत केल्यानंतर IPL स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयपीएल रद्द करण्यात आले नाही, म्हणजेच परिस्थिती सामान्य झाल्यानंतर उर्वरित सामने खेळवले जातील. मात्र, हे सामने कधी आणि कुठे खेळवले जातील, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. यापूर्वीही लोकसभा निवडणुकीमुळे 2024 मधील आयपीएलचे सामनेदेखील दोन भागात खेळवण्यात आले होते. पहिला भाग 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान चालला, ज्यामध्ये 21 सामने खेळले गेले. निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर,

उर्वरित सामने आणि प्लेऑफचे वेळापत्रक तयार करून खेळवण्यात आले. यामुळे स्पर्धा सुरळीत पार पडली आणि कोणतीही अडचण आली नाही. भारताच्याऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने गुरुवारी (8 मे) भारतातील अनेक शहरांवर ड्रोन हल्ले केले.

पण, आधीपासूनच तयारीत असलेल्या भारतीय सैन्याने हे सर्व हल्ले परतून लावली अन् पाकिस्तानात घुसून चोख प्रत्युत्तर दिले. रात्री पाकिस्तानने हल्ला सुरू करताच उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला. याचा परिणाम आयपीएलवर दिसून आला. त्यामुळे आता आयपीएलचा चालू हंगाम स्थगित केला आहे.

You Might Also Like

मेघालयात अवैध बांगलादेशी कुटुंब पकडले

अमेरिकेमुळे भारतीय शेतकऱ्यांचे 4 कोटींचे नुकसान

भाजपकडून राहुल गांधींची तुलना असिम मुनीरशी

मुंबई-पुण्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक; नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन

शास्त्रज्ञ एम.आर. श्रीनिवासन यांचे निधन

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चंद्रकांत पाटील यांनी ‍नवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस
Next Article पाकिस्तानातील अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याच्या सूचना

Latest News

आमदार देवेंद्र कोटी यांनी मानले सोलापूर महापालिकेचे आभार
सोलापूर May 20, 2025
उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी यशस्वी
सोलापूर May 20, 2025
सोलापुरातील उद्योजकांसाठी दुबईमध्ये प्लॅटफॉर्म तयार करणार- आ. सुभाष देशमुख
सोलापूर May 20, 2025
जयकुमार गोरे यांची सोलापूर विकास मंच शिष्टमंडळाची सविस्तर बैठक फलदायी
सोलापूर May 20, 2025
मेघालयात अवैध बांगलादेशी कुटुंब पकडले
देश - विदेश May 20, 2025
अमेरिकेमुळे भारतीय शेतकऱ्यांचे 4 कोटींचे नुकसान
देश - विदेश May 20, 2025
भाजपकडून राहुल गांधींची तुलना असिम मुनीरशी
देश - विदेश May 20, 2025
अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस
Hot News May 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?