Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘लढा अजून संपलेला नाही’, विजयी मेळाव्यात मराठी कलाकारांची भावना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

‘लढा अजून संपलेला नाही’, विजयी मेळाव्यात मराठी कलाकारांची भावना

admin
Last updated: 2025/07/05 at 4:28 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 5 जुलै (हिं.स.)। मराठी भाषेच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आल्याचं दृश्य आज मुंबईतील विजयी मेळाव्यात पाहायला मिळालं. या ऐतिहासिक मेळाव्यात मराठी चित्रपटसृष्टीतील काही मान्यवर कलाकारही उपस्थित होते. त्यांनी मराठीसाठी झालेल्या एकजुटीचं कौतुक करत आपल्या भावना व्यक्त केल्या. या मेळाव्यात अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी उपस्थिती लावली. त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत मराठीसाठी लढण्याची गरज अधोरेखित केली.

“झेंडा नाही, अजेंडा आहे” – भरत जाधव

“हा लढा आपल्यालाच लढावा लागतो हे दुर्दैव आहे. हे अपयश नाही, पण राजकारणातली गणितं समजत नाहीत. आज मला ‘झेंडा नाही, अजेंडा’ ही ओळ खूप आवडली. मराठीसाठी सर्वांनी एकत्र यावं लागेल. राजसाहेब आमच्या चित्रपटांसाठी नेहमी उभे राहतात, ते आज आवाहन करतायत, म्हणून मी इथे आलो,” असं भरत जाधव म्हणाला.

“राजसाहेबांना ऐकण्यासाठी आलोय” – सिद्धार्थ जाधव

“मराठी कलाकारांना मिळणाऱ्या स्क्रीनसाठी आपण अनेकदा आवाज उठवला आहे. पण आजचा दिवस हा त्या संघर्षाचा एक टप्पा आहे. हिंदीतही आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत, पण मराठीसाठी जेव्हा राजसाहेब बोलत आहेत, तेव्हा त्यांचं ऐकणं आवश्यक आहे. लोकांच्या उत्साहामुळे मी स्वतः उत्सुक आहे की ते काय बोलतात,” असं सिद्धार्थ जाधव म्हणाला.

“हा मराठी विरुद्ध हिंदी वाद नव्हता” – तेजस्विनी पंडित

“आज दोन भावंडं मतभेद विसरून एकत्र आली आहेत. हे महाराष्ट्रासाठी मोठं चित्र आहे. हा वाद मराठी विरुद्ध हिंदी असा नव्हता, तर सक्तीच्या विरोधात होता. सुशिक्षित लोकांना हे नक्कीच कळेल. जोपर्यंत मराठी माणसं एकत्र आहेत, तोपर्यंत कोणताही निर्णय कायम राहू शकत नाही,” असं तेजस्विनी पंडित यांनी ठामपणे सांगितलं.

या मेळाव्यामुळे मराठी भाषेच्या भवितव्यासाठी जनमानसात नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. सरकारने जीआर रद्द करून एक योग्य पाऊल उचललं असलं तरी हा लढा पुढेही सुरू राहील, असाच सूर या कलाकारांच्या भावना व्यक्त करताना दिसला.

You Might Also Like

लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना

देशभरात मान्सूनचा जोर; मप्र-राजस्थानात पूरस्थिती, वीज कोसळून, बुडून पाच जणांचा मृत्यू

राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून उज्ज्वल निकमांसह चौघे राज्यसभेवर

दिग्गज दाक्षिणात्य अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन

भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका ३-२ ने जिंकली

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘जय गुजरात’ म्हणणाऱ्या महायुतीने राज्याची माफी मागावी – डॉ.हुलगेश चलवादी
Next Article नीरव मोदीचा भाऊ नेहलला अमेरिकेत अटक

Latest News

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
राजकारण July 14, 2025
मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्र July 14, 2025
राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार
देश - विदेश July 14, 2025
विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन
देश - विदेश July 14, 2025
चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर
देश - विदेश July 14, 2025
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन
देश - विदेश July 14, 2025
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
देश - विदेश July 14, 2025
लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना
Top News July 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?