Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण होणार – अशोक उईके
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण होणार – अशोक उईके

admin
Last updated: 2025/06/06 at 8:32 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 6 जून (हिं.स.)। राज्यात ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल राज्यातील 1 कोटी 35 लाख आदिवासी बांधवांतर्फे महायुती सरकारचे अभिनंदन करीत आहोत, असे राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी शुक्रवारी सांगितले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी महायुती सरकारने हे महत्वपूर्ण पाऊल उचलून या आयोगासाठी वेगळी अर्थसंकल्पीय तरतूद ही केल्याबद्दल श्री. उईके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे आभार मानले.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. उईके बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टी जनजाती मोर्चाचे प्रदेश सचिव प्रवीण धोडिया, जनजाती मोर्चाच्या मुंबई अध्यक्ष ज्योती धोडी, निलम वरठे, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. या आयोगामुळे आदिवासी समाजाच्या संविधानिक हक्कांचे रक्षण होण्यास मदत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी श्री. उईके म्हणाले की, या आयोगाचा मोठा लाभ आदिवासी समाजाला होणार आहे. एक अध्यक्ष व चार अशासकीय सदस्य या आयोगात कार्यरत रहाणार असून त्यासाठी येणा-या खर्चास मान्यता देखील देण्यात आली आहे. अनुसूचित जमातीच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हा आयोग काम करणार आहे. आदिवासी समाजाच्या प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य आणि स्थानांतराविषयीच्या सर्व समस्या शासनापुढे मांडण्याचे मोलाचे काम आयोग करेल असेही त्यांनी नमूद केले. शासन, आदिवासी समाज आणि प्रशासन यातील महत्वाचा दुवा म्हणून ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग’ येणा-या काळात काम करेल असा विश्वासही श्री. उईके यांनी बोलून दाखवला.

You Might Also Like

पुढील चार आठवड्यांसाठी राज्याच्या हवामानाचा अंदाज जाहीर

बकरी ईद – जनावरांच्या कत्तलीसाठी प्रतिबंधित बाबी

क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे काम सरकार करतंय – बावनकुळे

सिंधू पाणी करार – पाकिस्तानकडून भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी

रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “भारतात दंगली घडवण्याचा पाकिस्तानचा डाव होता”- पंतप्रधान
Next Article जनतेच्या मनात आहे, तेच होईल, मनसे युतीबाबत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Latest News

पुढील चार आठवड्यांसाठी राज्याच्या हवामानाचा अंदाज जाहीर
महाराष्ट्र June 6, 2025
बकरी ईद – जनावरांच्या कत्तलीसाठी प्रतिबंधित बाबी
महाराष्ट्र June 6, 2025
रशियाकडून युक्रेनमध्ये ४०० ड्रोन, ४० बॅलेस्टिक मिसाईलने प्रतिहल्ला, मोठे नुकसान
देश - विदेश June 6, 2025
हाफिज सईदला कुठल्याही परिस्थीतीत भारताला सोपवणार नाही- तल्हा सईद
देश - विदेश June 6, 2025
क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे काम सरकार करतंय – बावनकुळे
महाराष्ट्र June 6, 2025
जनतेच्या मनात आहे, तेच होईल, मनसे युतीबाबत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
राजकारण June 6, 2025
“भारतात दंगली घडवण्याचा पाकिस्तानचा डाव होता”- पंतप्रधान
देश - विदेश June 6, 2025
सिंधू पाणी करार – पाकिस्तानकडून भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी
महाराष्ट्र June 6, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?