Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सर्वात मोठी तोफ, एकदाच चालविली आणि तलाव बनला, वाचा सविस्तर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

सर्वात मोठी तोफ, एकदाच चालविली आणि तलाव बनला, वाचा सविस्तर

Surajya Digital
Last updated: 2021/04/02 at 11:23 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

जयपूर : भारतातील महाराणा प्रताप यांच्या तलवारीची गोष्ट असो किंवा टिपू सुलतानच्या तोफेची. या राजा-महाराजांची शान त्यांच्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या शस्त्रांनीच होती. अशीच आता एका तोफेची माहिती जाणून घेऊयात. जी आशियात सर्वात मोठी आहे. तिचा वापर एकदाच झाला आणि तिचा वापर केल्यानंतर चक्क मोठा तलावच बनल्याचे सांगितले जाते. वाचूयात या तोफेची सविस्तर माहिती.

राजस्थान येथील एका किल्ल्यात ही तोफ आहे. जी केवळ एकदाच चालविली गेली. ती एकदाच चालली पण तिचा प्रभाव आजही एका तलावाच्या स्वरुपात बघायला मिळतो. ही तोफ आशियाखंडातील सर्वात मोठी तोफ आहे.

याचा आकार एवढा मोठा होता की, जेव्हा या तोफेला चालविण्यात आले तेव्हा, यामधून निघालेला गोळा हा ३५ किलोमीटर दूर एका गावात जाऊन पडला आणि तिथे चक्क एक तलाव बनला. सुरवातीच्या काळात या तोफांचा उपयोग दगड फेकण्यासाठी केल्या जात होता. ही तोफ आधी तांबा आणि कांस्य या धातूपासून बनविण्यात आली. १५ व्या शतकात ही तोफ ३० इंच परिघाच्या असायच्या आणि १२०० ते १५०० पाउंड वजनाचे दगडाचे गोळे यातून फेकण्यात यायचे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या तोफेचं वजन ५० टन आहे. ही तोफ किल्ल्याच्या डूंगर दरवाज्यावर ठेवण्यात आली आहे. या तोफेची नळीपासून ते शेवटच्या भागाची लांबी ३१ फुट ३ इंच आहे. म्हणूनच जेव्हा या तोफेतून गोळा सुटला तेव्हा तो जयपूरहून ३५ किलोमीटर लांब असणाऱ्या चाकसू नावाच्या क्षेत्रात जाऊन पडला. या तोफेच्या गोळ्याने बनलेल्या तलावात आजही पाणी आहे, हे इथल्या लोकांची पाण्याची गरज भागवत आहे.

या तोफेमध्ये ८ मीटर लांब बॅरल ठेवण्याची सुविधा आहे. म्हणूनच ही तोफ आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ म्हणून प्रसिद्ध आहे. जाणकारांच्या मते ३५ किलोमीटर पर्यंत निशाना साधण्यासाठी या तोफेला १०० किलो गनपावडरची गरज असेल.

इतिहासकारांच्या मते या तोफेच्या वजनामुळे तिला कधीही किल्ल्याच्या बाहेर नेण्यात आले नाही. त्यामुळे तिचा कुठल्याही युद्धात उपयोग झाला नाही. या तोफेला केवळ एकदाच परीक्षण करण्याकरिता चालविण्यात आले. किल्ल्याच्या दक्षिण दिशेने ३५ किलोमीटर दूर असलेला तलाव हा याच तोफेच्या परीक्षण करताना निघालेल्या गोळ्यामुळे बनला आहे, असे सांगितल्या जाते.

लोखंडाची तोफ आल्यानंतर लोकांच्या लक्षात आले की दगडांऐवजी लोखंडाच्या गोळ्यांनी जास्त नुकसान पोहोचवता येते, त्यामुळे त्यानंतर लोखंडापासून तयार करण्यात आलेली तोफ आणि गोळ्यांचा वापर केला जाऊ लागला असल्याचे सांगितलं जात आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #largest #cannon #firedonce #became #lake #read #detail, #सर्वात #मोठीतोफ #एकदाच #चालविली #तलावबनला #वाचा #सविस्तर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोनाचे निर्बंध झुगारुन हजारोच्या गर्दीत बगाड यात्रा
Next Article शाळेत बसवली कंडोम वेंडिंग मशीन, यासाठी सरकार पूरवते निधी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?