Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: समाज व्यवस्था अबाधित राखण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची:साठे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

समाज व्यवस्था अबाधित राखण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची:साठे

admin
Last updated: 2024/08/19 at 12:14 AM
admin
Share
2 Min Read
SHARE
उत्तर सोलापूर/प्रतिनिधी
उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपले कुटुंब, शेती व्यवसाय, समाज यापासून युवा वर्ग दुरावत आहे.भरपूर शिका,मोठे व्हा, मोठ्या पॅकेजच्या नोकरी करा.मात्र आपली भारतीय संस्कृती जपा, नाही तर एक दिवस कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही,अशी भिती व्यक्त करुन भारतीय समाज व्यवस्था अबाधित राखण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे जिल्हा अध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी व्यक्त केले.
वडाळा येथील श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शिक्षण संकुलाच्या वतीने आयोजित केलेल्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण व गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान काका साठे यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.देविदास साठे,संस्थेचे अध्यक्ष व वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे, प्राचार्या डॉ.वैशाली साठे, संस्थेचे संचालक जयदीप साठे, बाळासाहेब सुतार, प्राचार्य डॉ. शिरीष भोसले, संजयकुमार वाघमारे, प्राचार्य डॉ.नागेश सर्वदे, उपसरपंच अनिल माळी, माजी सरपंच प्रभाकर गायकवाड, सुधीर कांबळे, नारायण गाडे, मनोज साठे, संपत गाडे, संतोष सुभेदार, ज्ञानदेव साठे, वडाळा सोसायटीचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय गायकवाड यावेळी उपस्थित होते.
   न्यू हायस्कूलचे माजी विद्यार्थी मंगेश नाईक यांची केंद्र सरकारच्या हवाई प्राधिकरणात नियंत्रण अधिकारी, मंगेश जमदाडे यांची सातारा येथील छत्रपती संभाजी महाराज शासकीय रुग्णालयात परिचारक अधिकारी या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल, वैशाली केवटे, देशमाने यांनी योगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
देश स्वतंत्र झाला.आता स्वातंत्र्य टिकविण्याची जबाबदारी तरुणांची असून आपले कुटुंब,गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देशाप्रती नितांत आदर व प्रेम जपावे, असे आवाहनही काका साठे यांनी केले.पर्यवेक्षक प्रा.पी.आर.पाटील यांनी प्रास्ताविक, पत्रकार दत्ता मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले.

You Might Also Like

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सरन्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न, लातूरातील वकिलांनी काढला मोर्चा

जर यावेळी युद्ध झाले, तर पाकिस्तानचा मोठा विजय होईल – पाक संरक्षणमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस : शरद पवारांचे असंख्य कार्यकर्ते अजित पवारांकडे

काँग्रेसने पोस्ट केलेल्या पंतप्रधान मोदींच्या आईचा एआय व्हिडिओवर भाजपाची टीका

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते येवती रस्त्याच्या कामाचे उद्घाटन
Next Article म्हसवड-धुळदेव इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये गारवाडचा समावेश -ॲड.सोमनाथ वाघमोडे

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?