सोलापूर/प्रतिनिधी
हावी व बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. या विध्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशाकरीता आवश्यक विविध प्रकारचे दाखले उपलब्ध करुन देण्यासाठी महाविदयालय स्तरावरच दाखले वितरण शिबीर आयोजित करण्यात येणार आहे या माध्यमातून विध्यार्थ्यांना तातडीने दाखले मिळतील अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिली.
दरवर्षी दहावी व बारावीची परीक्षा संपल्यानंतर प्रवेशाच्या वेळी विविध प्रकारच्या दाखल्यांकरीता सेतू व महासुविधा केंद्रात पालक व विध्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. एकाचवेळी गर्दी होत असल्याने अनकेदा विध्यार्थ्यांना दाखले मिळविताना अनेक अडचणीस सामोरे जावे लागते. त्यामुळे विध्यार्थ्यांना सुलभपध्दतीने आवश्यक दाखले मिळावेत यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकरी यांनी सांगितले.गावपातळीवर तलाठी यांच्याकडून या उपक्रमासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. पुढील आठवडयापासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा दिलेल्या विध्यार्थ्यांची माहितीही प्रशासनाकडून संकलीत करण्यात येत आहे.
विध्यार्थ्यांना प्रवेशाकरीता जात, उत्पन्न, रहिवास या प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता आहे. या सर्व दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती पालक व विध्यार्थ्यांना देण्यात येत आहे. शिबीरातच दाखल्यांसाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पुर्ण करुन त्यांना दाखले वितरण करण्याची मोहिम घेण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात तहसील व अप्पर तहसील कार्यालयाच्या परिसरात सेतू सुविधा केंद्र आहेत. याशिवाय जिल्ह्यात एक हजारापेक्षा जास्त आपले सुविधा केंद्र आहेत. या सुविधा केंद्राचे योगदान या शिबीरात घेण्यात येत आहे. विध्यार्थ्यांकडुन कोणत्याही प्रकारचे अतिरीक्त शुल्क घेतले जाणार नाही याचीही दक्षता घेण्यात येत आहे. जर कोणी पैशांची मागणी केलीच तर क्यूआर कोडवर नागरिक व विध्यार्थ्यांना प्रशासनाकडे तक्रार करता येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले