अमरावती, 14 मे (हिं.स.)।
मंगळवार हा निकालवार ठरला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल मंगळवारी घोषित होणार हे ठरले होते. परंतु, केंद्रीय शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने बुधवारी बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचीही तारांबळ उडाली आहे.
निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये धाव घेतली आहे. शहराच्या अनेक शाळांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली.
परंतु, यावर्षी आश्चर्याची बाब म्हणजे एकाच दिवशी तीन परीक्षांचे निकाल जाहीर झाल्याने त्याचा परिणाम मिठाईच्या व्यवसायावर झाल्याचे पाहयला मिळाले. निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांचे कौतूक म्हणून आप्तेष्ट आणि शाळांमध्ये मिठाई वाटली जाते. एकाच दिवशी तीन निकाल जाहीर झाल्याने अचानक मिठाईची मागणी वाढली असून मंगळवारी अमरावती शहरात लाखोंचा व्यवसाय झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे शाळांच्या नजीक असलेल्या मिठाईच्या दुकानांमध्ये पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक झाल्याने व्यवसायिकांचीही तारांबळ उडाल्याचे चित्र होते.
—————