Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राजकीय भूकंप; ‘या’ व्यक्तीचा मोठा हात, सर्व आमदारांकडून फोन काढून घेतले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

राजकीय भूकंप; ‘या’ व्यक्तीचा मोठा हात, सर्व आमदारांकडून फोन काढून घेतले

Surajya Digital
Last updated: 2022/06/22 at 9:04 AM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
□ एकनाथांच्या तावडीतून उस्मानाबादचे आ. पाटील निसटले□ एकनाथांच्या तावडीतून उस्मानाबादचे पाटील निसटलेस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ शिवसेनेला आणखी एक मोठा झटका; अनिल परब संकटात

□ एकनाथांच्या तावडीतून उस्मानाबादचे आ. पाटील निसटले

 

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. या भूकंपाचं केंद्र ठरलं गुजरातमधील सूरत. या राजकीय भूकंपामागे गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा मोठा हात असल्याचं बोललं जात आहे. सुरतमध्ये ली मेरिडियन हॉटेलमधील सगळी व्यवस्था स्वतः पाटलांनी केली होती. सी. आर पाटील हे ‘ऑपरेशन लोटस’ची महत्वाची भूमिका पार पाडत असल्याची माहिती समोर आली आहे. State earthquakes; The big hand of ‘this’ person, took away the phone from all the MLAs

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांकडून मोबाईल फोन काढून घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने संपर्क करु नये, यासाठी खबरदारी म्हणून त्यांचे मोबाईल फोन काढून घेतले आहेत. दरम्यान, शिंदे यांच्यासोबत 40 आमदार आहेत. हे सर्व सध्या गुवाहाटीत दाखल झाले आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

बंडखोर आमदारांचा पहिला फोटो आला समोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा पहिला फोटो आता समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांना जवळपास 33 आमदारांचा पाठिंबा आहे. यामध्ये प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांचादेखील समावेश आहे.

 

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. या भूकंपाचं केंद्र ठरलं गुजरातमधील सूरत. या राजकीय भूकंपामागे गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा मोठा हात असल्याचं बोललं जात आहे. सुरतमध्ये ली मेरिडियन हॉटेलमधील सगळी व्यवस्था स्वतः पाटलांनी केली होती. सी. आर पाटील हे ‘ऑपरेशन लोटस’ची महत्वाची भूमिका पार पाडत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

दरम्यान दिल्लीतली बैठक आटोपून शरद पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यामुळे राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर पवार मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईत आल्यानंतर आजच रात्री तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील आहेत. यामुळे राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राष्ट्रपती पदासाठी जी बैठक घेण्यात आली होती ती बैठक आटोपून ते तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. ते मुंबईत आल्यानंतर तिन्ही पक्षांची ते बैठक घेणार असल्याचे बोलले जात आहे. ते मुंबईत आल्यानंतर महाविकास आघाडीबाबत काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल.

 

□ एकनाथांच्या तावडीतून उस्मानाबादचे पाटील निसटले

सोलापूर : जेवणासाठी बाहेर जाण्याची मारलेली थाप, वेगळ्याच दिशेला निघालेली गाडी, त्यातून आलेला संशय आणि काही तरी अघटित घडत असल्याची कुणकुण लागताच उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी गाडीचालकास लघुशंकेची थाप मारून गुजरात बॉर्डरवरून पलायन केले आणि थेट ‘मातोश्री’ गाठली.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/566273218383745/

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

विधानपरिषद निवडणूक संपल्यावर एकनाथ शिंदे यांनी जेवायला बोलाविले आहे, असे सांगून आ. कैलास पाटील यांना एका खासगी गाडीतून मुंबई बाहेर नेण्यात आले. ठाण्यापासून सुमारे ४० किमी पुढे गाडी गेल्यानंतर काहीतरी गडबड आहे, कैलास पाटील यांच्या लक्षात आले. त्याच क्षणी त्यांनी तेथून निसटण्याचा निश्चय केला.

 

मला लघुशंकेला थांबायचं आहे असे सांगून ते गाडीतून उतरले. अंधाराचा फायदा घेऊन से तिथून पसार झाले. जीव धोक्यात घालून कैलास पाटील यांनी संबंधित सर्वानाच गुंगारा देत रात्रीच्या अंधारात गुजरात महाराष्ट्र बॉर्डरवरून भर पावसात ४ किमी पायी आले. त्यानंतर मिळेल त्या गाडीने त्यांनी मुंबई गाठली. खुद्द आमदार कैलास पाटील यांनी हा किस्सा शिवसेना नेतृत्वाला सांगितला.

 

□ शिवसेनेला आणखी एक मोठा झटका; अनिल परब संकटात

 

शिवसेनेचे नेते अनिल परब यांची ईडीकडून तब्बल 9 तासांपासून चौकशी सुरू आहे. दापोली रिसॉर्ट प्रकरणी त्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. त्यामुळे अनिल परबांवर अटकेची टांगती तलवार आहे. अशा चर्चा रंगत आहेत. तसेच एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेवर सरकार कोसळण्याचे संकट आहे. त्यामुळे शिवसेना दुहेरी संकटात सापडली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) कोणत्याही क्षणी राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते अनिल परब यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या ९ तासांपासून अनिल परब यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु आहे.

सध्या नाराथ एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या स्थितीत आले आहे. यात परब यांच्यावर कारवाई होऊन जर अटक झाली तर शिवसेनेला आणखीन मोठा झटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/566258021718598/

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #State #earthquakes #bighand #person #took #away #phone #all #MLAs #political #MahavikasAghadi, #राजकीय #भूकंप #व्यक्ती #चंद्रकांतपाटील #मोठा #हात #आमदार #फोन #महाविकास #आघाडी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राष्ट्रपती निवडणूक : भाजपकडून द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा
Next Article बच्चू कडू म्हणाले, डोक्यावरून पाणी गेलंय, समर्थन ५० आमदारांपर्यंत पोहोचेल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?