Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकरी सुखावला : राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये तुरीला 9,500 पर्यंतचा भाव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
शिवारमहाराष्ट्र

शेतकरी सुखावला : राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये तुरीला 9,500 पर्यंतचा भाव

Surajya Digital
Last updated: 2020/10/07 at 8:56 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

वाशिम : तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुरीला शासकीय हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. हमीभाव 5800 असला तरी राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये तुरीला 9500 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. वाशिमच्या बाजार समितीमध्ये शेतकरी आपल्याकडे असलेल्या तुरीच्या विक्रीसाठी गर्दी करताना दिसत आहे. वाशिमच्या बाजार समितीमध्ये तुरीच्या बाजारभावाने 6 वर्षांत पहिल्यांदाच उच्चांक गाठला आहे.

गेल्या काही दिवसापासून तुरीचे भाव वाढताना दिसत आहे. आज पुन्हा तुरीच्या भावामध्ये 100 रुपयांची वाढ झाली असून आता 9500 रुपये प्रती क्विंटल दराने विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आता जादा दर मिळत असल्याचा आनंद दिसत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

2014 मध्ये 13 हजार रुपये प्रती क्विंटल दराने विक्रीनंतर, गेल्या ६ वर्षात तूर विक्रीसाठी मोठ्या अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. आता बाजार समितीमध्ये तुरीला शासकीय हमीभावापेक्षा अडीच ते साडे तीन हजार रुपयांचा अधिकचा दर मिळत आहे.

एकट्या वाशिम जिल्ह्यात 1 लाख 9 हजार 231 क्विंटल तूर शासनाने 5800 रुपये दराने खरेदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आजच्या दराच्या तुलनेत 3 हजार रुपये नुकसान होत आहे. मात्र या खरेदीतून सरकारला जवळपास 30 कोटी रुपयांचा फायदा सरकारला झाला. अशाच प्रकारे राज्यातील इतर जिल्ह्यातून सरकारला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. त्यामुळे सरकारने आधारभूत किमतीने विक्री केलेल्या नफ्यामधून शेतकऱ्यांना बोनस देण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार थांबले होते. अनलॉक प्रक्रियेत हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले. यानंतर मागणी वाढल्याने तुरीचे दर वाढले असल्याचं कळतं. तर या वर्षी खरीप हंगामात पिकाचं मोठं नुकसान झालं. परिणामी पिकाच्या उत्पादनात घट होणार असल्याने दरवाढ होत असल्याचं जाणकार सांगतात. मात्र, या दरवाढीमुळं ग्राहकांना तूरडाळ खरेदी करण्यासाठी खिसा थोडा आणखी ढिला करावा लागणार आहे.

You Might Also Like

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

TAGGED: #तूर #वाशिम #उच्चांक #बाजारसमित्या #9500भाव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मराठा आरक्षणावरुन संभाजीराजेंचा राज्यसरकारला गंभीर इशारा; उदयनराजेंनी फिरवली बैठकीकडे पाठ
Next Article डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांना फटका

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?