Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उत्तरप्रदेश पोलिसांना सुप्रीम कोर्टातून 50 हजारांचा दंड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

उत्तरप्रदेश पोलिसांना सुप्रीम कोर्टातून 50 हजारांचा दंड

admin
Last updated: 2025/04/16 at 5:48 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

दिवाणी प्रकरणात फौजदारी गुन्हा नोंदवल्याचे प्रकरण

नवी दिल्ली, 16 एप्रिल (हिं.स.) : मालमत्तेशी संबंधीत दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणात फौजदारी गुन्हा नोंदवल्याबद्ददल उत्तरप्रदेश पोलिसांच्या 2 अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिवाणी प्रकरणात फौजदारी गुन्हा नोंदवणे अयोग्य आणि कायद्याच्या विरोधातील कृती असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे.

उत्तरप्रदेशच्या कानपूर येथील रिखब बिरानी आणि साधना बिरानी यांच्यावर शिल्पी गुप्ता या महिलेने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केला होता. एका गोदाम विक्रीचा तोंडी व्यवहार झाला होता, पण संपूर्ण रक्कम वेळेत न दिल्यामुळे विक्रेते (बिरानी) यांनी ती मालमत्ता दुसऱ्याला विकली. शिल्पी गुप्ता यांनी स्थानिक कोर्टात दोन वेळा एफआयआर नोंदवण्यासाठी विनंती केली, पण दोन्ही वेळा हा वाद दिवाणी स्वरूपाचा असल्याचे सांगून उच्च न्यायालयाने एफआयआर नोंदवण्यास नकार दिला. तरीही स्थानिक पोलिसांनी स्वतःहून एफआयआर दाखल केला, जो फसवणूक, धमकी देणे यासारख्या गुन्ह्यांखाली होता.

याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. संजय कुमार यांच्या खंडपीठाने म्हटले की, दिवाणी वादामध्ये (सिव्हील डिस्प्यूटस) गुन्हेगारी कारवाई करणे योग्य नाही. अशा प्रकारची प्रकरणं कोर्टात अनावश्यक भार वाढवतात आणि कायद्याचा गैरवापर होतो. सर्वोच्च न्यायालयाने 50 हजार रुपये दंड लावला. तसेच हा दंड संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडून वसूल करावा असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. दिवाणी वादाचे गुन्हेगारीकरण रोखणे, पोलिसांची जबाबदारी आणि मर्यादा स्पष्ट करणे, न्यायप्रविष्ट्यांमधील गैरवापराला आळा घालणे यादृष्टीने हे प्रकरण महत्वाचे आहे.

You Might Also Like

केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी

हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी

काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी

अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा

कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उजनी धरणाची मृत पाणी साठ्याकडे वाटचाल
Next Article पंतप्रधान मोदींच्या हस्ते ३० एप्रिलला होणार आंबा महोत्सवाचे उदघाटन

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?