Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विराट फ्लॉप ! 50 डाव झाले पण शतक होईना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

विराट फ्लॉप ! 50 डाव झाले पण शतक होईना

Surajya Digital
Last updated: 2021/08/26 at 3:37 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

लीड्स : इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटीत कर्णधार विराट कोहली 17 चेंडूवर फक्त 7 धावा काढून बाद झाला. यानंतर विराटचा खेळ आता संपला आहे, तो फ्लॉप ठरला आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहे. विराटसाठी आकडेवारीही धक्कादायक आहे. गेल्या 50 डावात त्याला एकही आंतरराष्ट्रीय शतक करता आले नाही. 642 दिवसांपूर्वी त्याने पहिले शतक केले होते. नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध कोहलीने 136 धावांची खेळी केली होती.

याआधी विराटच्या करिअरमध्ये असे दोन वेळा झाले होते जेव्हा त्याला दोन शतकांच्या मध्ये बराच वेळ लागला होता. फेब्रुवारी  2011 ते सप्टेंबर  2011  या काळात 24 डावा त्याला शतक करता आले नव्हते. त्यानंतर फेब्रुवारी 2014 ते ऑक्टोबर 2014 या काळात 25 डावात तो शतक करू शकला नव्हता. पण यावेळी विराट 50 डावांपर्यंत पोहोचला आहे.

भारताने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पहिल्याच दिवशी बुधवारी लाजिरवाणी कामगिरी केली. भारताचा पूर्ण संघ 78 धावांवर बाद झाला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याआधी भारताने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या (36) केली होती. तर 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध पूर्ण भारतीय संघाला फक्त 42 धावा करता आल्या. तसेच 1974 मध्ये भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना 58 धावांवर बाद झाला.

तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्याकडून एका चांगल्या खेळीची सर्वांनाच अपेक्षा असताना पहिल्या डावात तो केवळ 7 धावा करुन बाद झाला आहे. त्याच्यासह संपूर्ण भारतीय संघाचा  पहिला डाव केवळ 78 धावांवर आटोपला असून याचवेळी विराटच्या नावे नको ते अर्धशतक झाले आहे.

तर हे अर्धशतक म्हणजे विराट मागील 50 आंतरराष्ट्रीय डावांत एकही शतक ठोकू शकलेला नाही. नोव्हेंबर, 2019 मध्ये बांग्लादेश विरुद्ध डे-नाइट कसोटी सामन्यात शेवटचं शतक ठोकणाऱ्या विराटच्या बॅटमधून पुन्हा शतक कधी येईल? य़ाची सर्वच भारतीय आतुरतेने वाट पाहत आहेत. पण लीड्स येथील तिसऱ्या कसोटीतही विराटच्या हाती निराशाच आल्याने त्याने 50 आंतरराष्ट्रीय डाव हे शतक न ठोकता घालवले आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये 27 शतकांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 70 शतकं ठोकणाऱ्या कोहलीचा सध्या खराब टाईम सुरु आहे. मागील दोन वर्षात एकाही प्रकारात तो शतक ठोकू शकलेला नाही. याआधी तो सलग 25 डावांत शतक ठोकू शकला नव्हता. मात्र आता ही संख्या 50 झाली आहे. शतकच नाही तर कोहलीला अर्धशतक ठोकणंही अवघड झालं आहे. कारण 2020 पासून आतापर्यंत तो केवळ 3 कसोटी अर्धशतकं ठोकू शकला आहे. इंग्लंडच्या या दौऱ्यात तो आतापर्यंत WTC पकडून तो 7 डाव खेळला आहे. ज्यामध्ये एकही अर्धशतक आलेले नाही. आता लीड्समधील दुसऱ्या डावाततरी तो हा दुष्काळ संपवतो का? हे पाहावे लागेल.

You Might Also Like

धोनीने मित्रांबरोबर साजरा केला ४४ वा वाढदिवस

विराट कोहलीचा पुतण्या क्रिकेटच्या मैदानात

जसप्रीत बुमराह लॉर्ड्स कसोटी सामन्यात खेळणार – शुभमन गिल

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

TAGGED: #Virat #flop #50innings #but #no #century, #विराट #फ्लॉप #50डाव #शतक #होईना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नान्नजमध्ये विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू
Next Article गांजा लागवडीला परवानगी देण्यासाठी शेतकऱ्याचे थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Latest News

Massive fire at shopping mall in Iraq; 60 people killed, many missing
इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग; ६० लोकांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
देश - विदेश July 17, 2025
IndiGo's Delhi-Goa flight makes emergency landing in Mumbai; all passengers safe
इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाचे मुंबईत आपत्कालीन लँडींग; सर्व प्रवासी सुरक्षित
Top News July 17, 2025
हरियाणा : रोहतकमध्ये पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
देश - विदेश July 17, 2025
Army jawan arrested for spying for Pakistan
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सैन्य जवानाला अटक
देश - विदेश July 17, 2025
Electricity will be free in Bihar; Chief Minister Nitish Kumar's big announcement before elections
बिहारमध्ये वीज मोफत होणार; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमारांची मोठी घोषणा
देश - विदेश July 17, 2025
लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन; पुण्यात अंत्यसंस्कार
महाराष्ट्र July 16, 2025
फौजा सिंग यांचा हिट अँड रन प्रकरणात एनआरआय अमृतपाल सिंग ढिल्लनला अटक
Top News July 16, 2025
देशात पहिली टेस्ला कार दाखल; प्रताप सरनाईक बनणार पहिले ग्राहक?
महाराष्ट्र July 16, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?