Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विशाखापट्टणम : नरसिंह स्वामी मंदिराची भिंत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

विशाखापट्टणम : नरसिंह स्वामी मंदिराची भिंत कोसळून ८ जणांचा मृत्यू

admin
Last updated: 2025/04/30 at 7:01 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

– पंतप्रधानांकडून मदत जाहीर

विशाखापट्टणम, 30 एप्रिल (हिं.स.)। आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर सिंहाचलम येथे मंगळवारी (दि.२९)रात्री भीषण अपघात झाला आहे.श्री वराह लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिराच्या भिंतीचा २० फूट लांबीचा भाग कोसळल्याने हा अपघात घडला.या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील श्री वराह लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिरात चंदनोत्सव चालू होता.यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी जमा झाली होती, त्यावेळी अचानक 20 फूट उंचीची एक भिंत कोसळली. यानंतर मंदिरात गोंधळ उडाला.सिंहगिरी बसस्थानकापासून वर जाताना मंदिराला लागून असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळील ही भिंत होती.अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा २:३० ते ३ वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसामुळे हा अपघात झाला. जिल्हाधिकारी हरेंद्र प्रसाद म्हणाले की, एनडीआरएफ आणि एसडीआरएफने बचावकार्य पूर्ण केले आहे.

राज्याच्या गृह आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री वंगालपुडी अनिता यांनीही तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पावसामुळे माती ओली झाली, त्यामुळे भिंत कोसळल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि पीडितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे, असं त्यांनी सांगितलं.तसेच या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. त्यांनी प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना प्रधानमंत्री राष्‍ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. ‘पीएमओ इंडिया’ने एक्स या सोशल मीडिया साईटवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भिंत कोसळल्याने झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुःख झाले. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याविषयी माझ्या संवेदना व्यक्त करतो. तसेच या घटनेत जखमी झालेले नागरिक लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना. प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना प्रधानमंत्री राष्‍ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.”

—————

You Might Also Like

कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस

कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

ट्रम्प यांनी लाँच केला स्वतःच्या ब्रँडचा स्मार्टफोन

तांत्रिक बिघाडामुळे अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचे विमान रद्द

राज्याच्या कानाकोपऱ्यातील जनतेच्या सेवेसाठी भाजपा सदैव कटिबद्ध – रविंद्र चव्हाण

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सिसोदिया आणि जैन यांच्या अडचणीत वाढ
Next Article ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल 355 रुपये रास्त आणि किफायतशीर भाव

Latest News

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
महाराष्ट्र June 17, 2025
कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस
देश - विदेश June 17, 2025
आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
महाराष्ट्र June 17, 2025
शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र June 17, 2025
कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
देश - विदेश June 17, 2025
राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
सोलापूर June 17, 2025
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
सोलापूर June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?