Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

admin
Last updated: 2025/06/24 at 5:33 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 24 जून (हिं.स.) : राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात अवघ्या 5 महिन्यात 8 टक्के मतदार वाढल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय. यासंदर्भात ट्विट करत राहुल यांनी आणखी काही आरोप लावले आहेत.

राहुल गांधी यांनी अमेरिकेहुन परतल्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत वृत्तपत्रात लेख लिहून निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले होते. तर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस वस्तुस्थिती मांडत राहुल यांच्या आरोपांना उत्तर दिले होते. तर आता राहुल गांधी यांनी थेट फडणवीस यांच्या मतदारसंघात वाढलेल्या मतदानाचा मुद्दा एक्सवर उपस्थित करून मोठा आरोप केला आहे. आपल्या पोस्टमध्ये राहुल म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात केवळ 5 महिन्यांत मतदार यादीत 8 टक्के मतांची वाढ झाली आहे. काही मतदान केंद्रांवर 20 ते 50 टक्के पर्यंत मतांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांनीही अनोळखी लोकांनी मतदान केल्याचे सांगितल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

हजारो मतदारांचे पत्ते हे अयोग्य पद्धतीचे असल्याचे माध्यमांनीही स्पष्ट केले आहे. यावर निवडणूक आयोग शांत का आहे ? असा सवाल करून या सगळ्यांमध्ये निवडणूक आयोग सहभागी आहे का ?, हे अपघाती नाही, हे थेट मतांची चोरी आहे. त्यामुळे मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज तातडीने प्रसिद्ध करा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

You Might Also Like

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी

गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत – डॉ. नीलम गोऱ्हे

संजय गायकवाडांना समज देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, मराठी माणसाच्या भल्यासाठी राज आणि मी एकत्र आलोय – उद्धव ठाकरे

स्व. रामभाऊ म्हाळगी यांचं कार्य आजही मार्गदर्शक – रविंद्र चव्हाण

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
Next Article शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

Latest News

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
राजकारण July 14, 2025
मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्र July 14, 2025
राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार
देश - विदेश July 14, 2025
विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन
देश - विदेश July 14, 2025
चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर
देश - विदेश July 14, 2025
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन
देश - विदेश July 14, 2025
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
देश - विदेश July 14, 2025
लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना
Top News July 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?