Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: divert flood कृष्णेच्या पुराचे पाणी वळवण्याच्या २० हजार कोटींच्या प्रकल्पाला तत्वत: मान्यता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

divert flood कृष्णेच्या पुराचे पाणी वळवण्याच्या २० हजार कोटींच्या प्रकल्पाला तत्वत: मान्यता

Surajya Digital
Last updated: 2023/07/13 at 8:24 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)○ आठ जिल्ह्यातील एक कोटी लोकांना होणार फायदा

□ खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नाला यश

 

सोलापूर : सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, पुणे जिल्ह्यातील काही भाग व सोलापूर व मराठवाडा या भागातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कृष्णा खोरेचे पाणी वळविण्याच्या (फ्लड डायवर्षण) प्रोजेक्टला तत्वतः मान्यता मिळाली असल्याची माहिती खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिली आहे. 20,000 crores project to divert flood water of Krishna River approved in principle by Deputy Chief Minister Devendra Fadnavis MP Ranjitsinh Naik-Nimbalkar

 

मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या विनंतीनुसार माढा लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार बबनदादा शिंदे, जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर, कार्यकारी संचालक कपोले, अधीक्षक अभियंता कुमार पाटील, मुख्य अभियंता गुणाले, कार्यकारी अभियंता योगेश सावंत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली.

 

पावसाळ्यामध्ये कोल्हापूर सांगली व साताऱ्यातील काही भाग मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यानंतर कृष्णा नदीतून जे पाणी वाहून जाते, त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे जनजीवन व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी आपण जर दुष्काळी भागातील जनतेला उपलब्ध करून दिले तर त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सिंचन होईल व सातारा जिल्ह्यातील माण खटाव, फलटण, पुणे जिल्ह्यातील काही भाग व सोलापूर व मराठवाडा या भागातील जनतेला पाणी उपलब्ध होऊन या भागातील दुष्काळ कायमस्वरूपी संपेल. ही बाब खा. निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

त्यानंतर बुधवारी तातडीची बैठक घेऊन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली.

 

हा प्रकल्प अंदाजे २० हजार कोटी रुपयांचा असून त्यासाठी लागणाऱ्या सर्वेक्षणाच्या निधीची तरतूद करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. यामुळे मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेला खूप मोठी भेट फडणवीस यांनी दिल्याचे खा. निंबाळकर यांनी सांगितले.

 

 

○ आठ जिल्ह्यातील एक कोटी लोकांना होणार फायदा

 

सांगली, कोल्हापूर, सातारा, क्षेत्रातील गावांना याचा फायदा होणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील सुमारे एक कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. भविष्यात दुष्काळी भागाचा कायमस्वरूपी शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटणार आहे. हा संपूर्ण भाग ओलिताखाली येणार आहे. यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल. हरित क्रांती बरोबर आर्थिक क्रांती होईल तसेच हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे, असे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी सांगितले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

TAGGED: #20000crores #project #divertflood #water #KrishnaRiver #approved #principle #DeputyChiefMinister #DevendraFadnavis #MP #RanjitsinhNaik-Nimbalkar, #कृष्णा #नदी #पुराचे #पाणी #वळवणे #२०हजारकोटी #प्रकल्प #तत्वत: #मान्यता #उपमुख्यमंत्री #खासदार #देवेंद्रफडणवीस, #रणजितसिंहनाईक-निंबाळकर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मॅरेथॉन बैठका । अजित पवार वर्षावर दाखल; खातेवाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर
Next Article दोघात तिसरा… मंत्रीपद विसरा; ‘अर्थ’ वरुन ‘अनर्थ’ आता विस्तार अधिवेशनानंतरच

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?