Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उजनीत ८ हजार ४०० क्युसेक्सने पाणी येण्यास सुरुवात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

उजनीत ८ हजार ४०० क्युसेक्सने पाणी येण्यास सुरुवात

Surajya Digital
Last updated: 2021/07/21 at 9:08 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

टेंभुर्णी : पुणे जिल्ह्यात व भीमा खो-यासह उजनी धरण पाणलोट क्षेत्रात ओढ दिलेल्या पावसाने अखेर काल मंगळवारपासून संततधार  पडत असल्याने या पावसामुळे आज बुधवारी (दि. २१ ) सायंकाळी सहा वाजता दौंड येथून ८ हजार ४०० क्युसेक्स विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे.

सध्याची पाणी पातळी  वजा ३.३४ टक्के पाणीसाठा आहे. येत्या  दोन दिवसात उजनी धरण पाणीपातळी मृत साठ्यातून बाहेर येऊन प्लसमध्ये येण्याची आशा  आहे. गत वर्षी २० जुलै रोजी उजनी धरण मृत साठ्यातून बाहेर आले होते.

आज बुधवारी सायंकाळी सहा वाजता दौंड येथून ८ हजार ४०० क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता. सध्या पाणी पातळी  वजा ३.३४ टक्के पाणीसाठा आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

चालू हंगामात उन्हाळ्यात १३ मे रोजी उजनी धरणाची जिवंत साठ्यातून मृत साठ्याकडे वाटचाल चालू झाली होती. मागील वर्षी देखील उजनी धरण १३ मे रोजी मृत साठ्यात गेले होते.

२ जून पासून गेल्या पन्नास दिवसात उजनी धरणात कमी अधिक पावसामुळे १० टिएमसी पाणीसाठा वाढला आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने २ जूनपासून उजनी पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झाली होती. यावर्षी वजा २२. ४२ टक्के इतका पाणीसाठा खाली गेला होता. तर सध्या एकूण ६१. ८४ टिएमसी पाणीसाठा सून वजा १. ७९ टिएमसी पाणीसाठा आहे.

पुणे जिल्ह्यात पावसाची संतधार अशीच सुरू राहिल्यास उजनी धरण दोन दिवसात मृत साठ्यातून बाहेर येण्याची शक्यता असून उजनी शंभर टक्के भरण्याची आशा निर्माण झाली आहे. उजणी धरण पाणलोट क्षेत्रात जून महिन्यापासून २३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

उजनी प्लस होण्याकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एकदा उजनी प्लस झाली की वर्षभर पाण्याचा प्रश्न मिटतो.  सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची पूर्ण भिस्त या उजनीवर आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतीलाही उजनीचे पाणी आवश्यक असते.

You Might Also Like

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता

मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर

छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा

दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी

अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे

TAGGED: #Water #started #flowing #Ujjain #cusecs, #उजनीत #क्युसेक्सने #पाणी #येण्यास #सुरुवात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
Next Article ‘आगे बडो, मराठा आरक्षण मिळेपर्यंत मागे हटायचं नाही’

Latest News

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी
महाराष्ट्र May 8, 2025
अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?