मुंबई : गंगेत तरंगणाऱ्या प्रेतांना ऑक्सिजन किंवा लस मिळाली नाही. भाजप नेते म्हणतात तसे, कोरोनामुक्त करणारे गोमुत्र तरी मिळायला हवे होते, अशी खरमरीत टीका पंतप्रधान मोदींवर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून केलीय.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी गंगेत आढळून आलेली प्रेत आणि कोरोनाच्या परिस्थितीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1396312767624204293?s=19
जगभरातील माध्यमांनी गोमुत्रावरुन आपली चेष्टा केली. देशात लस नसताना लस उत्सव साजरा केला. जगातील अनेक देश कोरोनामुक्त झाले. कोरोना काळात आपण मात्र, निवडणुका आणि CBI, ED चा खेळ करत बसलो, अशी टीकाही केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांना कोरोना झाला नाही. त्याचे श्रेय त्या नियमित गोमूत्र प्राशनाला देतात. गंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांना ऑक्सिजन, लस मिळाली नाही. निदान त्यांना गोमूत्र तरी मिळायला हवे होते. कोरोना असो की चक्रीवादळ प्रत्येक संकटाचे राजकारण सुरूच आहे. म्हणून गंगेत फेकलेली प्रेते जिवंत होतील काय? असा परखड सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1394532487691259906?s=19
हिंदुस्थानातील गोमूत्र प्राशनावर रशियासह अनेक देशांतील वृत्तपत्रांनी आपली चेष्टा केली आहे. गंगेत जे हजारो कोरोनाग्रस्त मृतदेह सोडून दिले व त्यांच्यावर धड अंत्यसंस्कारही होऊ शकले नाहीत, त्यांच्यापर्यंत हा गोमूत्र संदेश गेला असता तर त्यांना गंगेत फेकून देण्याची वेळ आली नसती. गंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांनी हिंदुस्थानचा भेसूर चेहरा जगासमोर आणला, असंही राऊत म्हणाले.
* मृतदेह उचला, मग निवडणुकांचं बघू!
प. बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत या संकटकाळातही राजकारण सुरूच आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी याही परिस्थितीत सांगितले की, आज निवडणुका घेतल्या तरी भाजपाला 400 जागा मिळतील. पण आधी गंगेतून वाहून आणलेले मृतदेह उचला, मग निवडणुकांचं बघू!
लोकांचे जगण्याचे आणि मरण्याचेही वांधे झाले आहेत आणि हे महाशय म्हणतात, चारशे जागा जिंकू. (कोठून आणतात हे इतका आत्मविश्वास?) देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण फाजिल आत्मविश्वासाचे फुगे उंच हवेत उडत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.
* ममता बॅनर्जी बहुमताने विजयी झाल्याचा सूड घेतला जातोय
‘प. बंगालात सीबीआयचे लोक घुसले व त्यांनी बेकायदेशीरपणे ममता सरकारातील दोन मंत्री व दोन आमदारांना अटक केली. या मंत्र्यांना अटक करण्याची परवानगी विधानसभा अध्यक्षांनी दिलीच नव्हती. मुळात ज्या प्रकरणात या अटका झाल्या त्या ‘नारदा’ स्टिंग प्रकरणात भाजपचे सध्याचे प्रमुख नेते हातभर फसले आहेत. त्या लाचखोरीत सुवेन्दू अधिकारी या पलटीरामाचे नाव आहे. अधिकारी यांनी पाच लाख रुपये स्वीकारल्याचे त्या चित्रफितीत दिसते.
पण हे अधिकारी महाशय ममतांना सोडून भाजपमध्ये आले. त्यामुळे त्यांना अटक झाली नाही. राज्यपाल धनकड यावर मौन बाळगून आहेत व त्यांची नौटंकी चालू आहे. ‘नारदा’ने पकडलेल्या सहाच्या सहा लोकांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले असते तर सीबीआयच्या कारवाईवर कोणीच प्रश्न विचारले नसते. पण भाजपमध्ये गेले ते सुटले हा मुद्दा आहे. ममता बॅनर्जी या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या याचा सूड घेतला जात आहे’, अशी टीकाही राऊत यांनी केली.