Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘भारताने सांडलेल्या रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेणार’- शाहबाज शरीफ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

‘भारताने सांडलेल्या रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेणार’- शाहबाज शरीफ

admin
Last updated: 2025/05/08 at 2:41 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

लाहोर , 8 मे (हिं.स.)।भारताने बुधवारी (दि.७) पहाटे पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणावर हवाई हल्ला केला. यामुळे पाकिस्तानचा तीळपापड झाला असून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या देशाला बुधवारी रात्री संबोधित केले आहे.पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी हवाई दलाच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली, दुसरीकडे शाहबाज शरीफ यांनी भारताने सांडलेल्या रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेणार असल्याची धमकी दिली आहे.

भारताने गेल्या रात्री जी चूक केली त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. पाकिस्तानने भारताला जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे, काही तासांतच आम्ही त्यांना मागे ढकलले आहे. भारताने केलेल्या हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या शहीदांच्या पाठीशी पाकिस्तान उभा आहे, असे शरीफ म्हणाले. भारताला रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत चुकवावी लागेल, अशी धमकीही त्यांनी दिली.

काल रात्री भारत पूर्ण तयारीने आला होता. ८० लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या ६ जागांवर हल्ला केला. रात्री आम्हाला याची माहिती मिळत होती. काल रात्री आमच्या ‘शत्रूने’ रात्रीच्या अंधारात आमच्यावर हल्ला केला, परंतु अल्लाहच्या आशीर्वादाने आमचे सैन्य त्यांना योग्य उत्तर देऊ शकले. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये एक दुर्दैवी घटना घडली, भारताने घाईघाईने कारवाई केली आणि भारतीय माध्यमांनी पाकिस्तानवर निराधार आरोप करायला सुरुवात केली, असे शाहबाज यांनी संसदेत कबुली देताना म्हटले आहे. पहलगाम हल्ल्याची बातमी मिळाली तेव्हा मी स्वतः तुर्कीच्या दौऱ्यावर होतो. आम्ही तेव्हाच स्पष्ट केले होते की या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत असे सांगितले होते, परंतु भारताने आमची ऑफर स्वीकारली नाही, असाही आरोप शाहबाज यांनी केला होता.

—————

You Might Also Like

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा

युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा

अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमेरिका, चीनसह बड्या देशांकडून त्यांच्या नागरिकांना भारत-पाकिस्तानात प्रवास न करण्याचा सल्ला
Next Article उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश, ६ जणांचा मृत्यू तर 1 जखमी

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?