Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

admin
Last updated: 2025/07/01 at 6:02 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

इस्लामाबाद , 01 जुलै (हिं.स.) : पाकिस्तान नेहमीच काश्मिरींच्या पाठीशी उभा राहील, जर भारताने हल्ला केला तर पाकिस्तान देखील प्रत्युत्तर देईल, अशी धमकी पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताला दिली आहे. असीम मुनीर कराची याठिकणी पाकिस्तानी नौदल अकादमीमध्ये आयोजित पासिंग आउट परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आले असताना येथे भाषणादरम्यान त्यांनी भारताला इशारा दिला आहे.

असीम मुनीर म्हणाले, “भारत ज्याला दहशतवाद म्हणतो तो एक वैध संघर्ष आहे. पाकिस्तान नेहमीच काश्मीरला मदत करेल.” असे त्यांनी म्हटले आहे. मुनीर एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, “जर भारताने भविष्यात हल्ला केला तर पाकिस्तानही प्रत्युत्तर देईल. आम्ही हे दोनदा केले आहे. प्रथम आम्ही २०१९ मध्ये बालाकोट हवाई हल्ला उधळून लावला आणि आता ऑपरेशन सिंदूर.” याचदरम्यान, त्यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांना समर्थन देत भारत आणि काश्मीरबद्दल अनेक भडकावू गोष्टी देखील सांगितल्या.असीम मुनीर यांची भारताला धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही तर त्यांनी यापूर्वीही अनेकदा भारताविरुद्ध विष ओकले आहे.आता पुन्हा एकदा त्यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांना समर्थन दिले आहे.

दरम्यान, भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले होते. त्यात शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेले होते. या काळात पाकिस्तानी सैन्याने अनेक भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सैन्याने पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यात आली. तथापि, यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली. भारतीय नौदल देखील पाकिस्तानचे मोठे नुकसान करणार होते, असे एका वृत्तानुसार, नौदलाने लक्ष्य निश्चित केले होते, परंतु त्यांना आदेश देण्यात आले नव्हते.

You Might Also Like

राजकीय विश्लेषक राजा माने यांना ‘शांतीदूत’ राज्यस्तरीय पुरस्कार

सोलापूर सीईओ जंगम यांनी शिक्षणाधिकार्यांवर चिडून सभागृह सोडले

भीमा नदीच्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

उजनी धरणाचा विसर्ग घटल्याने पंढरपूरमधील पुरधोका टाळता आला

सोलापूर जिल्ह्यात ४१५४ सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी; “एक गाव-एक गणपती” चालना

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
Next Article उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन

Latest News

भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी
देश - विदेश August 24, 2025
फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना
देश - विदेश August 24, 2025
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते” – सुप्रिया सुळे यांचा वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र August 24, 2025
गणेशोत्सवासाठी कोकणकडे धावपळ; रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड गर्दी
महाराष्ट्र August 24, 2025
पूरपश्चात व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पाटील यांनी दिले निर्देश
महाराष्ट्र August 24, 2025
नांदेडमध्ये पूरग्रस्तांसाठी खासदार गोपछडे यांनी २० लाख रुपयांची मदत जाहीर
महाराष्ट्र August 24, 2025
पालकमंत्री पाटील यांनी पूरबाधितांसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले
महाराष्ट्र August 24, 2025
मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला आग; सर्व ४५ प्रवासी सुरक्षित बचावले
महाराष्ट्र August 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?