अमरावती, 22 मे (हिं.स.) इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यभरात बुधवारी २१ मेपासून प्रत्यक्ष नोंदणी व पसंतिक्रम नोंदविणे प्रक्रिया सकाळी ११ वाजता सुरु होणार होती. मात्र, संकेतस्थळ सकाळपासून बंद असल्याने पहिल्याच दिवशी फज्जा उडाडा. तांत्रिक दुरूस्तीचे काम सुरु असल्याने प्रक्रिया सुरु झालेली नाही. नोंदणीसाठी विद्यार्थी, पालक ताटकळले आहेत. तर प्रक्रिया करण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील नेमण्यात आलेले शिक्षकही गोंधळात पडले असून विद्यार्थ्यांसह पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १ हजार ४२२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला वाणिज्य, विज्ञान या तीन शाखांसाठी एकूण प्रवेश क्षमता १ लाख ८६ हजार ४७५ इतकी आहे.अकोला जिल्ह्यात २६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेत १३ हजार ९१५, वाणिज्य शाखेत ५ हजार २९५ आणि विज्ञान शाखेत १७ हजार ८०५, अशी एकूण ३७ हजार १५ प्रवेश क्षमता आहे. अमरावती जिल्ह्या तील ३१० कनिष्ठ महाविद्याल यांमध्ये कला शाखेत १८ हजार ६०, वाणिज्य शाखेत ५ हजार ८६० आणि विज्ञान शाखेत १७हजार २६०, अशी एकूण ४१ हजार १८० प्रवेश क्षमता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ३४० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कलाशाखेत १८ हजार ३७०, वाणिज्य शाखेत ६ हजार २२० आणि विज्ञान शाखेत २० हजार ५६० अशी एकूण ४५ हजार १५० इतकी प्रवेश क्षमता आहे. वाशीम जिल्ह्यातील १९५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेत १० हजार २७०, वाणिज्य शाखेत २ हजार २० आणिविज्ञानशाखेत १० हजार ९९० अशी एकूण २३ हजार २८० इतकी प्रवेश क्षमता आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ३१७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेत २० हजार १२५, वाणिज्य शाखेत ४ हजार ९४५ आणि विज्ञान शाखेत १४ हजार ७८० अशी एकूण ३९ हजार ८५० इतकी प्रवेश क्षमता आहे.
दिवसभर प्रवेश प्रक्रियेत अडथळा
शिक्षण विभागाने २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. २१ मेपासून २८ मेपर्यंतविद्यार्थ्यांना प्रवेशासाठीप्रत्यक्ष नोंदणीकरता येणार आहे. परंतु, पहिल्याच दिवशी बुधवारी सकाळी ११ वाजता सुरु होणारी प्रक्रिया काहीवेळ लांबली. संकेतस्थळाचे काम सुरु असून लवकरच सुरु होईल, असा संदेश येत असल्याचेही काही पालक, शिक्षकांनी सांगितले.