Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बायकोने जरी मारलं तरी मोदींनाच जबाबदार धरतील – फडणवीस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

बायकोने जरी मारलं तरी मोदींनाच जबाबदार धरतील – फडणवीस

Surajya Digital
Last updated: 2021/06/26 at 3:40 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नागपूर : यांना त्यांच्या बायकोने जरी मारलं तरी हे लोक मोदींनाच जबाबदार धरतील’, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. ते नागपुरातील ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील चक्काजाम आंदोलनात बोलत होते. ज्या ठिकाणी हे राज्य सरकार नापास होते, तिथे हे मोदीजींनी करायला पाहिजे होते, असे एका सुरात बोलतात, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून आज भाजपचे राज्यभर चक्काजाम आणि जेलभरो आंदोलन सुरू आहे. नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान आमच्या हातात सूत्र द्या, ओबीसी आरक्षण परत आणले नाही तर राजकारणातून संन्यास घेईल, अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.

नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन झाले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांना ताब्यात घेतले. #surajyadigital #भाजपा #DevendraFadnavis #nagpur #सुराज्यडिजिटल #OBCReservationhttps://t.co/OFdFI1v3gM

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021

मंत्रीच ओबीसी आरक्षणासाठी मोर्चे काढत होते. त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली असती, तर ओबीसी आरक्षण कायम असतं. आता कोरोनामुळे आणखी नवीन निर्बंध लावले. मग त्यामध्ये पाच जिल्ह्यांच्या निवडणुका होतातच कशा? ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका घेतल्यास सर्वोच्च न्यायालयात समस्या निर्माण होईल. आपण सर्व मिळून ओबीसी आरक्षण परत आणू. त्यासाठी आमच्या हातात सूत्र द्या. ओबीसी आरक्षण परत आणलं नाहीतर राजकारणातून संन्यास घेईल, अशी मोठी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली. आज फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नागपुरात चक्काजाम आंदोलन यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्रात १५०० ठिकाणी ओबीसींच्या जनतेसाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे सरकारला ओबीसींचं आरक्षण द्यावं लागेल नाहीतर सरकारला खुर्ची खाली करावी लागेल. ओबीसींचं आरक्षण गेलं हे राजकीय षडयंत्र आहे, असेही फडणवीस म्हणाले.

सोलापूर : मार्केट यार्ड चौकात ओबीसी आरक्षण रद्द निषेधार्थ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा चक्काजाम, पोलिसांनी घेतले ताब्यात #surajyadigital #सुराज्यडिजिटल #OBCReservation #भाजपा #solapur #सोलापूर pic.twitter.com/bfJLmzbA1g

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021

ओबीसीला संविधानात भाजपने जागा दिली. ही जागा काँग्रेस, राष्ट्रवादीने दिली नाही. आम्ही ओबीसींसाठी वेगळं खातं तयार केलं. या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत? तर दोन जणांनी ओबीसी आरक्षणविरोधात याचिका केली. त्यापैकी वाशिममधल्या काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा आणि भंडाऱ्याचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. मग ओबीसी आरक्षण रद्द करणारे हे काँग्रेस आहे, अशी टीकाही फडणवीसांनी केली.

राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण शिल्लक आहे. तुमचे १५ महिने पूर्ण होत नाहीतर महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. वडेट्टीवारांचे वक्तव्य वेळोवेळी बदलले आहेत. दोन महिन्यात इम्पिरिकल डेटा गोळा करू, असे वडेट्टीवार म्हणाले. त्यानंतर मोदींनी डेटा दिला नाही, असे ते म्हणाले. पण, हा सुर कोणाच्यातरी दबावाखाली असल्यामुळे आला आहे. या सरकारमध्ये ओबीसी नेत्यांची हालत म्हणजे एखाद्या ताटामध्ये चटणी आणि कोशिंबिर असते त्याचे जितके महत्व आहे, तितकंच महत्व ओबीसी नेत्यांचं आहे. यांचे षडयंत्रण आहे, ओबीसीला आरक्षणापासून वंचित ठेवायचे, असा आरोपही फडणवीसांनी केला.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #wife #kills #Modi #responsible #Fadnavis #Arrested, #बायकोने #मारलं #मोदींनाच #जबाबदार #फडणवीस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रत्नागिरी – राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले
Next Article जानकर परिवाराच्या विवाह सोहळ्यास शरद पवार यांची हजेरी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?