Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिक्षकांशी चर्चा करुनच निर्णय घेणार – बच्चू कडू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शिक्षकांशी चर्चा करुनच निर्णय घेणार – बच्चू कडू

admin
Last updated: 2025/05/16 at 4:29 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 16 मे (हिं.स.)

विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे आता विधान परिषदेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू हे अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता आपण या संदर्भात शिक्षकांशी चर्चा करून त्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पुढील वर्षी होणार्‍या या निवडणुकीत बच्चू कडू पुन्हा एकदा विधान परिषदेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करत असल्याचे दिसून येईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू हे सलग चार वेळा निवडून आले होते. त्यांनी 2004, 2009, 2014 आणि 2019 या काळात सलग या मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ते आता शिक्षक मतदार संघातून पुन्हा एकदा विधिमंडळात जाण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात अपक्ष आमदार किरण सरनाईक यांचे वर्चस्व आहे. किरण सरनाईक यांचा कार्यकाळ हा 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक होणार आहे. त्यातच अमरावती मध्ये नुकत्याच पार पडलेल्या प्रहार शिक्षक संघटनेच्या मेळाव्यात मतदारसंघातून बच्चू कडू यांनी निवडणूक लढवावी, असा असा आग्रही पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्याला बच्चू कडू यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र आपण शिक्षकांशी चर्चा केल्यानंतरच या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

विधान परिषदेच्या सभागृहात बच्चू कडू यांचा आवाज गुंजणार का?

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघामध्ये अमरावती बरोबरच अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश होतो. या मतदारसंघातील शिक्षकांमध्ये होणारी ही निवडणूक चुरशीची मानली जाते. त्यात आता बच्चू कडू यांचा या निवडणुकीत प्रवेश झाल्यास या निवडणुकीची चर्चा राज्यभर होईल. त्यामुळे विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या सभागृहात बच्चू कडू यांचा आवाज गुंजणार का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

You Might Also Like

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री

कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतकरी हित व सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण गरजेचे – अजित पवार
Next Article दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे धोरण – विखे पाटील

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?