Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अनेक महिन्यांचा पगार थकीत; कर्मचा-यांकडून कंपनीची तोडफोड, 437 कोटींचे नुकसान, 125 जणांना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

अनेक महिन्यांचा पगार थकीत; कर्मचा-यांकडून कंपनीची तोडफोड, 437 कोटींचे नुकसान, 125 जणांना अटक

Surajya Digital
Last updated: 2020/12/14 at 10:47 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील नरसापूर इंडस्ट्रियल भागात असलेल्या तायवान कंपनीच्या कारखान्यात कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे. कंपनीने गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचा पगार थकित ठेवल्याने ही थोडफोड केल्याचे वृत्त समोर आले आहे.

wistron नावाची ही कंपनी भारतात जगप्रसिद्ध अॅपल कंपनीच्या आयफोनचं उत्पादन करते. कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की, कंपनीने गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचा पगार दिलेला नाही. अनेक महिन्यांचा पगार थकीत असल्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी आपला राग कंपनीत तोडफोड करुन काढला आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या तोडफोडीमध्ये कंपनीचं थोडं थोडकं नाहीतर तब्बल 437 कोटी रुपयांचं नुकसान झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी 125 जणांना अटक केली आहे. कर्मचारी हिंसाचार करत असलेले व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यामध्ये कर्मचारी काचा, सीसीटीव्ही, पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या गाड्यांच्या काचा आणि लाईट्स फोडताना दिसत आहेत. लोखंडी रॉडने करण्यात आलेल्या या तोडफोडीत सहा गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच बॅटरीला आग लावण्यात आली. याशिवाय सुरक्षारक्षक आणि मॅनेजरला मारहाण करण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

* हिंसाचाराच निषेध – उपमुख्यमंत्री

गेल्या चार महिन्यांपासून आपल्याला पूर्ण पगार दिला जात नसून अतिरिक्त काम करण्याची सक्ती केली जात असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. कंपनीने मात्र आरोप फेटाळला असून कामगार कायद्याचं पालन करण्यास कटिबद्द असल्याचं म्हटलं आहे. कोरोना संकटातून बाहेर येत राज्यात आर्थिक गुंतवणूक येण्यासाठी सरकार प्रयत्न करत असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे नवी अडचण निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री सीएन अश्वथ नारायण यांनी आम्ही या हिंसाचाराच निषेध करतो असं म्हटलं आहे. तसंच योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

You Might Also Like

इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले

ऍड. राकेश किशोर यांची तात्पुरती नोंदणी रद्द

पंजाबमध्ये बब्बर खालसा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक

पंतप्रधान मोदींनी मुंबईत ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांची घेतली भेट

केदारनाथने गेल्या वर्षीचा विक्रम मोडला; भाविकांची संख्या १६.५६ लाखांवर

TAGGED: #अनेकमहिन्यांचा #पगारथकीत #कर्मचा-यांकडून #कंपनीची #तोडफोड #437कोटींचे #नुकसान #125जणांना #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन
Next Article लष्करात भरती होण्याचं स्वप्न पाहणा-या तरुणीची आत्महत्या, तीन दिवसाने सापडली सुसाईट नोट

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?