Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वुमेन्स प्रीमियम लीग : दिल्ली कॅपिटल्स पराभव करत मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळ

वुमेन्स प्रीमियम लीग : दिल्ली कॅपिटल्स पराभव करत मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद

admin
Last updated: 2025/03/16 at 12:07 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 16 मार्च (हिं.स.)।वुमन्स प्रीमीयर लीग 2025 स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान मुंबई इंडियन्सला मिळाला आहे. मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला ८ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. याआधी २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा विजेतेपद मिळवले होते.तर दिल्ली कॅपिटल्स सलग तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यांना तिसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई इंडियन्सला 149 धावांवर रोखून विजयासाठी 150 धावांचं आव्हान स्वीकारले.पण दिल्ली कॅपिटल्सने झटपट विकेट गमवल्या आणि या सामन्यात पराभव मिळवला. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा दिल्ली कॅपिटल्सचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं. तीन वर्षात थेट अंतिम फेरी गाठणारा दिल्ली हा एकमेव संघ आहे. मात्र तिन्ही वेळेस पदरी निराशा पडली.

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना झटपट विकेट गमावल्या. त्यामुळे दडपण वाढलं होतं. यास्तिका भाटिया आणि हिली मॅथ्यूज स्वस्तात बाद झाले. पण त्यानंतर नॅट स्कायव्हर ब्रंट आणि हरमनप्रीत कौर यांनी 88 धावांची भागीदारी करत संघाला सावरलं. ब्रंट 30 धावा करून बाद झाली आणि त्यानंतर झटपट विकेटची रांग लागली. मात्र यावेळी हरमनप्रीत कौरने 44 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 66 धावा केल्या. तर तळाशी आलेल्या अमनजोत कौर आणि संस्कृती गुप्ताने काही धावा जोडल्या. त्यामुळे 149 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 141 धावा केल्या आणि सामना 8 धावांनी गमावला.

शेवटच्या षटकात दिल्ली संघाला 14 धावांची गरज होती आणि नॅट स्कायव्हर ब्रंट गोलंदाजीसाठी आली होती. निक्की प्रसाद स्ट्राईकला होती. दिल्ली कॅपिटल्सच्या हाती फक्त एक विकेट होती. पहिल्या चेंडूवर निकीने एक धाव घेतली आणि चरणीला स्ट्राईक दिला. दुसऱ्या चेंडूवर चरणीने एक धाव घेत निक्कीला स्ट्राईक दिला. तिसरा चेंडू निर्धाव गेला आणि मुंबईच्या पारड्यात सामना पूर्णपणे झुकला. चौथ्या चेंडूवर निक्कीने 1 धाव घेतली आणि 2 चेंडूत 11 धावा अशी स्थिती आली. पाचव्या चेंडूवर चरणीने एक धाव घेतली आणि सामना मुंबईने जिंकल्यात जमा झाला. कारण एका चेंडूत 10 धावांची गरज होती आणि चमत्काराशिवाय पर्यात नव्हता. शेवटच्या चेंडूवर निक्कीने एक धाव घेतली आणि मुंबईने सामना 8 धावांनी जिंकला.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मिळणार मोफत; बावनकुळेंचा निर्णय
Next Article प्रसिद्ध गायक ए आर रहमान हॉस्पिटलमध्ये दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?