Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इराणमध्ये अडकले १५०० भारतीय विद्यार्थी, सरकार आणणार मायदेशी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

इराणमध्ये अडकले १५०० भारतीय विद्यार्थी, सरकार आणणार मायदेशी

admin
Last updated: 2025/06/16 at 4:38 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

तेहरान , 16 जून (हिं.स.)।इस्रायल- इराण संघर्षादरम्यान सुमारे १५०० भारतीय विद्यार्थी इराणमध्ये अडकले आहेत. इराणमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे, यामुळे या विद्यार्थ्यांशी पालकांचा काहीच संपर्क होत नाहीय. आमची मुले तिथे सुरक्षित नाहीत. सरकारने त्यांना बाहेर काढावे, असे आवाहन पालकांनी केले आहे. याचबरोबर इराक आणि पाकिस्तानने त्यांची मुले इराणमधून बाहेर काढली आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे.यानंतर आता इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार एक मोहीम सुरू करणार आहे

या युद्धात १५०० भारतीय विद्यार्थी अडकले असल्याचे काश्मीरच्या रेहाना अख्तर हिने म्हटले आहे. यामध्ये बहुतांश विद्यार्थी हे काश्मीरचे आहेत. दुसरीकडे इस्रायलमध्येही हमासपेक्षाही जास्त भयावह स्थिती आहे. केरळचा सूरज रंजन हा विद्यार्थी तिथे शिकत आहे. त्याने यावेळी परिस्थिती सर्वात भयानक आहे, असे म्हटले आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार एक मोहीम सुरू करणार आहे. ‘भारतीयांसह परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात सुरक्षितपणे पाठवले जाईल’, असं इराण सरकारने म्हटले आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना अझरबैजान, तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरून बाहेर काढले जाईल.

दरम्यान, इस्रायलने १५ जूनला दुपारी हजत दोस्त अली हॉस्टेलवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन भारतीय विद्यार्थी जखमी झाले. हे दोन्ही विद्यार्थी जम्मू आणि काश्मीरचे आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. विद्यापीठ प्रशासनाने त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना रामसर येथे हलवले आहे. या घटनेमुळे इराणमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावास या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी इराणसोबत चर्चा करत आहेत.

—————

You Might Also Like

पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

तांत्रिक बिघाडानंतर दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे ड्रीमलाइनर हाँगकाँगला परतले

पाकिस्तानने फेटाळला अणु हल्ल्यांत इराणच्या मदतीचा दावा

जातनिहाय जनगणनेसाठी केंद्राकडून अधिसूचना जारी

लखनऊ विमानतळावर मोठा अपघात टळला

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
Next Article पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

Latest News

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्र June 16, 2025
मोदी सरकारने ११ वर्षांत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली – प्रविण दरेकर
महाराष्ट्र June 16, 2025
शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 16, 2025
सरकारी योजनांचे दरवाजे ५५० भटके विमुक्तांना खुले
महाराष्ट्र June 16, 2025
विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयामध्ये करिअर करावे- आ. संग्राम जगताप
Top News June 16, 2025
राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे
महाराष्ट्र June 16, 2025
पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
देश - विदेश June 16, 2025
शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
महाराष्ट्र June 16, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?