Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तिलक वर्माच्या रिटायर्ड आउटवरुन सुनील गावस्कर हार्दिक पांड्यावर संतापले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

तिलक वर्माच्या रिटायर्ड आउटवरुन सुनील गावस्कर हार्दिक पांड्यावर संतापले

admin
Last updated: 2025/04/06 at 2:24 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

लखनऊ, 6 एप्रिल (हिं.स.)।आयपीएल स्पर्धेत शुक्रवारी(दि.५) झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंटसने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. मुंबईच्या या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याला जबाबदार धरण्यात येत आहे. तर काहीजण तिलक वर्माला जबाबदार धरत आहेत. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध तिलक वर्माने अत्यंत संथ फलंदाजी केली. त्यामुळे हार्दिक पांड्या याने तिलक वर्मा याला परत बोलावून घेतले आणि त्याच्या जागी सँटनरला फलंदाजीसाठी मैदानात आणले. या निर्णयावरुन भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी संताप व्यक्त केला आहे.

पहिली गोष्ट म्हणजे हार्दिकने तिलकला निवृत्त करत मिचेल सँटनरला फलंदाजीला आणले. तिलक हा चांगला सेट झाला होता आणि अखेरच्या षटकात तो मोठी फटकेबाजी करू शकला असता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हार्दिक पंड्यालाही यावेळी काही मोठे फटके मारता येत नव्हते. त्यामुळे तिलकला निवृत्त करण्यापेक्षा तो कर्णधार या नात्याने जबाबदारी स्विकारुन प्रथम निवृत्त व्हायला हवे होते. त्यामुळे हार्दिकने केलेल्या या गोष्टीला मुर्खपणाच म्हणता येईल, असे गावस्कर यांनी म्हटले.

मुंबई इंडियन्सला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 29 धावा करायच्या होत्या. त्यावेळी हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा मैदानात होते. त्यामुळे 29 धावांचे हे लक्ष्य गाठणे पूर्णपणे शक्य वाटत होते नव्हते. पण 19 व्या षटकात शार्दुल ठाकूरने एलएसजीसाठी सामना फिरवला. तिलक वर्माने 23 चेंडूत 25 धावा केल्या. त्यानंतर संघाने त्याला रिटायर्ड आउट केले. 19 व्या षटकात तिलक वर्मा रिटायर्ड आउट झाला. तिलक वर्माच्या जागी आलेल्या मिचेल सँटनरला दोन चेंडूत फक्त दोन धावा करता आल्या. तिलक वर्माला माघारी बोलावण्याचा निर्णय अनेकांना रुचला नाही. हार्दिक पांड्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला, पण पुढच्याच चेंडूंवर त्याने जोरदार पुनरागमन केले आणि लखनौचा 12 धावांनी विजय निश्चित केला.

You Might Also Like

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article स्काय डायव्हिंगवेळी पॅराशूट न उघडल्याने हवाई दलाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू
Next Article पोहरादेवीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?