Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत -मुख्यमंत्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत -मुख्यमंत्री

admin
Last updated: 2025/04/29 at 4:53 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, 29 एप्रिल (हिं.स.) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील मृत्यूमुखी पडलेल्या ६ मृतांच्या नातेवाईकांना ५० लाखांची मदत जाहीर केली आहे.याशिवाय या कुटुंबांच्या शिक्षण, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या हल्ल्यात पुण्यातली संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या मुलीला शासकीय नोकरी देण्याचा निर्णय देखील आज (दि.२९) मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या आज, मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये पहलगाममधील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रातील ६ मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याशिवाय या कुटुंबांच्या शिक्षणाची, रोजगाराची हमीदेखील राज्य सरकार घेणार आहे.जगदाळे कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच घोषणा केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विशेषाधिकार वापरत संतोष जगदाळेंच्या मुलीला आजच्या बैठकीमध्ये सरकारी नोकरी देण्याचा निर्णय निश्चित केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता.

या घटनेत एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. ज्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश होता. डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी हे कुटुंबियांसोबत एकत्र काश्मीर फिरायला गेले, ज्यात या तिन्ही मावसभावांचा मृत्यू झाला. तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघा मित्रांचाही मृत्यू झाला. तर नवी मुंबईतील दिलीप देसले यांचाही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.

You Might Also Like

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी

प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही : पुणे मनपा आयुक्त

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारताने संयुक्त राष्ट्राच्या मंचावर पाकिस्तानला पुन्हा खडसावले
Next Article sucide सोलापूर : अकरावीतील मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

Latest News

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
महाराष्ट्र June 17, 2025
कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस
देश - विदेश June 17, 2025
आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
महाराष्ट्र June 17, 2025
शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र June 17, 2025
कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
देश - विदेश June 17, 2025
राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
सोलापूर June 17, 2025
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
सोलापूर June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?