Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोलकातामधील हॉटेलमध्ये भीषण आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

कोलकातामधील हॉटेलमध्ये भीषण आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

admin
Last updated: 2025/04/30 at 1:15 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

कोलकाता , 30 एप्रिल (हिं.स.)।कोलकातामधील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची भयंकर घटना घडली आहे.यामध्ये १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.ही घटना मंगळवारी(दि.२९) रात्री मध्य कोलकातामधील फलपट्टी मछुआ परिसरात असलेल्या एका हॉटेल मध्ये घडली.कोलकाताचे पोलीस आयुक्त मनोज कुमार वर्मा यांनी माध्यमांशी बोलताना घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुराज हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली. मंगळवारी(दि.२९) रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास ही आग लागली. आगीत सापडून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. १४ मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, अनेक लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले, असे वर्मा यांनी सांगितले. जेव्हा ही आग लागल्याची घटना घडली. तेव्हा हॉटेलमध्ये ६० लोक होते. आगीत सापडल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी ११ पुरुष आहेत, एक महिला आणि २ मुलांचा समावेश आहे. आगीत मृत्यू झालेल्यांपैकी ८ जणांची ओळख पटली आहे. या घटनेत १३ लोक जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. उपचार केल्यानंतर १२ जणांना घरी सोडण्यात आले, तर एका जखमीवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा आग लागली. तेव्हा लोकांनी जीव वाचवण्यासाठी बाल्कनीतून खाली उड्या मारल्या. काही जणांना अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले. काही लोक हॉटेलच्या खिडक्यामधून बाहेर आले आणि तिथे उभे राहिले होते.दरम्यान, या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.

लोकांना मदत करण्याचे तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article टी-२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंच्या यादीत सूर्यकुमार, श्रेयससह अन्य ८ भारतीय खेळाडूंचा समावेश
Next Article पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व श्रद्धांजली म्हणून अमरावतीत कॅडल मार्च

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?