Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोलकातामधील हॉटेलमध्ये भीषण आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

कोलकातामधील हॉटेलमध्ये भीषण आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

admin
Last updated: 2025/04/30 at 1:15 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

कोलकाता , 30 एप्रिल (हिं.स.)।कोलकातामधील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची भयंकर घटना घडली आहे.यामध्ये १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.ही घटना मंगळवारी(दि.२९) रात्री मध्य कोलकातामधील फलपट्टी मछुआ परिसरात असलेल्या एका हॉटेल मध्ये घडली.कोलकाताचे पोलीस आयुक्त मनोज कुमार वर्मा यांनी माध्यमांशी बोलताना घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुराज हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली. मंगळवारी(दि.२९) रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास ही आग लागली. आगीत सापडून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. १४ मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, अनेक लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले, असे वर्मा यांनी सांगितले. जेव्हा ही आग लागल्याची घटना घडली. तेव्हा हॉटेलमध्ये ६० लोक होते. आगीत सापडल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी ११ पुरुष आहेत, एक महिला आणि २ मुलांचा समावेश आहे. आगीत मृत्यू झालेल्यांपैकी ८ जणांची ओळख पटली आहे. या घटनेत १३ लोक जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. उपचार केल्यानंतर १२ जणांना घरी सोडण्यात आले, तर एका जखमीवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा आग लागली. तेव्हा लोकांनी जीव वाचवण्यासाठी बाल्कनीतून खाली उड्या मारल्या. काही जणांना अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले. काही लोक हॉटेलच्या खिडक्यामधून बाहेर आले आणि तिथे उभे राहिले होते.दरम्यान, या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.

लोकांना मदत करण्याचे तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article टी-२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंच्या यादीत सूर्यकुमार, श्रेयससह अन्य ८ भारतीय खेळाडूंचा समावेश
Next Article पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व श्रद्धांजली म्हणून अमरावतीत कॅडल मार्च

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?