Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाकिस्तानकडून येणाऱ्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार – विंग कमांडर व्योमिका सिंह
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पाकिस्तानकडून येणाऱ्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार – विंग कमांडर व्योमिका सिंह

admin
Last updated: 2025/05/07 at 4:35 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 7 मे (हिं.स.)।’ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारतीय सशस्त्र दल आणि परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेत या मिशनची संपूर्ण माहिती दिली.यावेळी विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्तानला थेट इशारा देखील दिला आहे.

या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले की, “आमच्या गुप्तचर यंत्रणेने भारतावर आणखी हल्ले होऊ शकतात असे संकेत दिले आहेत. या कारवायांना वेळीच रोखणं आणि त्यांचा प्रतिकार करणं अतिशय आवश्यक आहे. आज सकाळी भारताने अशा सीमापार हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा आणि रोखण्याचा आपला अधिकार वापरला आहे. ही कृती अत्यंत विचारपूर्वक, कुणालाही चिथावणी न देणारी, प्रमाणबद्ध आणि जबाबदार आहे. दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यावर आणि भारताच्या मार्गावर असलेल्या संभाव्य आतंकवाद्यांना निष्क्रिय करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.”

दरम्यान, पत्रकार परिषदेच्या शेवटी विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आणि म्हटले की, “आम्ही पाकिस्तानकडून येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रियेला तोंड देण्यास तयार आहोत. जर, भविष्यात पाकिस्तानने कोणतीही चिथावणीखोर कारवाई केली, तर भारतीय सैन्य त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.”

भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, “७ मे २०२५ रोजी रात्री १.०५ ते १.३० दरम्यान, भारतीय सशस्त्र दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली जाईल. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी हे सुरू करण्यात आले. या कारवाईत नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आणि ती तळे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली. गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. त्यांना आता थांबवणे आवश्यक आहे.”

—————

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही’ – राज ठाकरे
Next Article हे धर्माविरुद्ध नाही तर दहशतवादा विरोधात युद्ध – भुजबळ

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?