इम्फाल, 15 मे (हिं.स.) : भारत-म्यानमार सीमेवर झालेल्या चकमकीत आसाम रायफल्सच्या जवानांनी 10 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. खांगजोय तालुक्यातील न्यू समताल गावात बुधवारी ही चकमक झाली. भारतीय सैन्याच्या ईस्टर्न कमांडने ट्विटरवर (एक्स) जारी केलेल्या संदेशात ही माहिती दिली.
सैन्याच्या ट्विटमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार आसाम रायफल्सच्या एका युनिटने 14 मे रोजी स्पीअर कॉर्प्स अंतर्गत खेंगजोय तहसीलमधील न्यू समताल गावात ही कारवाई सुरू केली. हा भाग भारत-म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे, जो अनेकदा दहशतवादी कारवायांचे केंद्र राहिला आहे. शोध मोहिमेंतर्गत सैनिकांनी परिसराला वेढा घातला. यावेळी अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला.
प्रत्युत्तरादाखल आसाम रायफल्सच्या जवानांनी गोळीबार केला. या चकमकीत 10 अतिरेकी ठार झाले आहेत. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान कोणताही सैनिक जखमी झालेला नाही.या ऑपरेशनचे वर्णन ‘कॅलिब्रेटेड’ म्हणजेच नियोजित आणि अचूक असे केले आहे.या परिसरात आणखी दहशतवादी लपण्याची शक्यता असल्याने शोध मोहीम अजूनही सुरू आहे.