Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘चिडिया’ बालपणातील स्वप्न आणि संघर्ष याच प्रभावी चित्रण – आशिष शेलार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

‘चिडिया’ बालपणातील स्वप्न आणि संघर्ष याच प्रभावी चित्रण – आशिष शेलार

admin
Last updated: 2025/05/24 at 2:43 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 24 मे (हिं.स.)। आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेला “चिडिया” हा चित्रपट येत्या ३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासाठी रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आले होते.

की मीडिया वर्क्स, उदाहरणार्थ निर्मित या संस्थेअंतर्गत चिडिया या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. स्मायली फिल्म्स यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तर, मेहरान अमरोही यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.

बालपणातील स्वप्न आणि संघर्ष याच प्रभावी चित्रण या चित्रपटातून दाखविण्यात आले असून अतिशय उत्तम असा चित्रपट झाल्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले तसेच चित्रपट सगळ्यांनी चित्रपट आवर्जून पहावा असे आव्हान करुन चित्रपटाच्या यशसाठी टीमला शुभेच्छा दिल्या.

“चिडिया” ही मुंबईच्या चाळीत रचलेली एक सुंदर कथा आहे, जिथे मुले त्यांच्या निरागसतेद्वारे त्यांच्या पात्रांची लवचिकता आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतिशय प्रयत्ननशील असतात. हृदयस्पर्शी कथा असलेल्या या चित्रपटाने जगभरातील प्रमुख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला असून आता तो संपूर्ण भारतातील लोकांच्या भेटीला येणार असल्याचे चित्रपटाचे निर्माते अकबर हुसैनी यांनी आवर्जून नमूद केले.

या चित्रपटात विनय पाठक अमृता सुभाष, श्रेयस तळपदे, इनामूल हक, ब्रिजेंद्र काळा यांच्या उत्कृष्ट बालकलाकार स्वर कांबळे, आयुष पाठक आणि हेतल गडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीत शैलेंद्र बर्वे, संकलन मोहित टाकळकर, कलादिग्दर्शन प्रितेश खुशवाह यांचे आहे, तर वितरण रिलायन्स एंटरटेनमेंट करणार आहे.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कुख्यात तस्कराच्या घरावर छापा, २५ हजाराचा गांजा, तलवार, ५ चायना चाकू जप्त
Next Article लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?