Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यात मान्सूनचं आगमन; पुढील ६-७ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

राज्यात मान्सूनचं आगमन; पुढील ६-७ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

admin
Last updated: 2025/05/28 at 4:38 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, २७ मे (हिं.स.) : राज्यात मान्सूनचं आगमन झालं असून हवामान विभागाने पुढील ६ ते ७ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रेड अलर्ट, तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, तसेच केरळ, कर्नाटक आणि गोव्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत कालपासून रिमझिम पावसाची नोंद झाली असून समुद्रात चार ते पाच मीटर उंच लाटा उसळल्याचं पाहायला मिळालं आहे. आज सकाळपासून ओहोटीमुळे समुद्राचे पाणी मागे सरकलं आहे.

दरम्यान, जळगावमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून फळबागांचे नुकसान आणि मशागतीचे काम लांबणीवर पडले आहे. गोंदिया जिल्ह्यातही मान्सूनची दमदार हजेरी लागली आहे.

रत्नागिरीत पावसामुळे प्रमुख नद्या पाणीदार झाल्या असून टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे विहिरी व तलाव भरले असून टँकरवरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे.

जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ४७ गावांना पुराचा धोका असून आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांना ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आणि आपत्कालीन टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मे महिन्यात पूर्वमोसमी पावसामुळे राज्यात तब्बल २५४ झाडे कोसळली असून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या विकासकामांमुळे झाडांची मुळे कमकुवत होऊन हे प्रकार घडल्याची चर्चा आहे.

You Might Also Like

ब्रिटनने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतीय कंपनीवर लावले निर्बंध

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सरन्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न, लातूरातील वकिलांनी काढला मोर्चा

जर यावेळी युद्ध झाले, तर पाकिस्तानचा मोठा विजय होईल – पाक संरक्षणमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस : शरद पवारांचे असंख्य कार्यकर्ते अजित पवारांकडे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमेरिकेत शिक्षणासाठी विद्यार्थी व्हिसा मुलाखतींवर बंदी
Next Article सावरकर एक अलौकिक प्रतिभावान पुरुष – महंत सुधीर दास

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?