Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यात मान्सूनचं आगमन; पुढील ६-७ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

राज्यात मान्सूनचं आगमन; पुढील ६-७ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

admin
Last updated: 2025/05/28 at 4:38 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, २७ मे (हिं.स.) : राज्यात मान्सूनचं आगमन झालं असून हवामान विभागाने पुढील ६ ते ७ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रेड अलर्ट, तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, तसेच केरळ, कर्नाटक आणि गोव्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत कालपासून रिमझिम पावसाची नोंद झाली असून समुद्रात चार ते पाच मीटर उंच लाटा उसळल्याचं पाहायला मिळालं आहे. आज सकाळपासून ओहोटीमुळे समुद्राचे पाणी मागे सरकलं आहे.

दरम्यान, जळगावमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून फळबागांचे नुकसान आणि मशागतीचे काम लांबणीवर पडले आहे. गोंदिया जिल्ह्यातही मान्सूनची दमदार हजेरी लागली आहे.

रत्नागिरीत पावसामुळे प्रमुख नद्या पाणीदार झाल्या असून टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे विहिरी व तलाव भरले असून टँकरवरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे.

जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ४७ गावांना पुराचा धोका असून आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांना ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आणि आपत्कालीन टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मे महिन्यात पूर्वमोसमी पावसामुळे राज्यात तब्बल २५४ झाडे कोसळली असून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या विकासकामांमुळे झाडांची मुळे कमकुवत होऊन हे प्रकार घडल्याची चर्चा आहे.

You Might Also Like

सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीत वाढ

रेल्वेत 2030 पर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट

छत्तीसगड : बसवा राजूसह 30 नक्षलवादी ठार

भुजबळ आणि माझ्यात मतभेद नाहीत – कोकाटे

अमरावतीत दगडाने ठेचून युवकाची हत्या

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमेरिकेत शिक्षणासाठी विद्यार्थी व्हिसा मुलाखतींवर बंदी
Next Article सावरकर एक अलौकिक प्रतिभावान पुरुष – महंत सुधीर दास

Latest News

राज्य, धर्म व भाषेपेक्षा अधिक मातृभूमीचा अभिमान बाळगावा – राज्यपाल
महाराष्ट्र May 30, 2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती – एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन
महाराष्ट्र May 30, 2025
नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक
देश - विदेश May 30, 2025
भंडाऱ्यात लुटणाऱ्या चौघांना अटक
महाराष्ट्र May 30, 2025
गोंदियात इलेक्ट्रिक खांबावरील अॅल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद, ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र May 30, 2025
नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान
देश - विदेश May 30, 2025
राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद
महाराष्ट्र May 30, 2025
पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर
देश - विदेश May 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?