Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

admin
Last updated: 2025/06/17 at 6:43 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

पुदुचेरी, 17 जून (हिं.स.) –

आपल्याला डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या स्वरूपात मानवी संसाधनांची,अधिक निदान केंद्रांची, अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. औषधांसाठी दुकाने तसेच सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील रुग्णालये, आरोग्य सेवा केंद्रे वाढवायची आहेत. यालाच आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी म्हणता येईल, असे वक्तव्य उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

पुदुचेरी येथील जेआयपीएमईआरच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना त्यांनी आरोग्याचे महत्त्व सांगितले.

ते ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल सांगताना ते म्हणाले, “जगातील सर्वात शांतताप्रिय राष्ट्राला जे कधीही विस्तारवादात सहभागी झालेले नाही त्याला भयावह दहशतवादी हल्ल्याचा सामना करावा लागला. पंतप्रधानांनी राष्ट्राला वचन दिले: दहशतवाद अजिबात खपवून घेतला जाणार नाही. हे पंतप्रधानांचे वचन खरे केल्याबद्दल मी आपल्या सशस्त्र दलांचे अभिनंदन करतो, कारण मुरीदके आणि बहावलपूर आपल्या ब्रह्मोसच्या सामर्थ्याचे साक्षीदार आहेत. संरक्षण साहित्याचे स्वदेशी उत्पादन आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे याची जाणीव जगाला झाली आहे.”

“कोणत्याही प्रगतीसाठी शांतता आवश्यक असून ही शांतता ताकद असेल तर मिळते. आपण युद्धासाठी नेहमीच सज्ज असणे ही शांततेची सर्वोत्तम हमी आहे आणि ती तेव्हाच मिळते जेव्हा राष्ट्रीय मानसिकता- राष्ट्र प्रथम ही असते “असेही ते म्हणाले.

बहुपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याच्या अलीकडच्या निर्णयाचे धनखड यांनी कौतुक केले. ते म्हणाले, “राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष आणि हितसंबंधांच्या पलीकडे आहेत. पंतप्रधानांनी परदेशात संसद सदस्यांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा दूरदर्शीपणा दाखवला, देशात आणि बाहेर या शिष्टमंडळाला योग्य प्रतिसाद मिळाला याचा मला आनंद आहे. सर्व राजकीय पक्ष त्यानिमित्ताने एकजूट झाले. राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय विकासासाठी आपल्याला हे कायम आवश्यक आहे.”

—————

You Might Also Like

राजकीय विश्लेषक राजा माने यांना ‘शांतीदूत’ राज्यस्तरीय पुरस्कार

सोलापूर सीईओ जंगम यांनी शिक्षणाधिकार्यांवर चिडून सभागृह सोडले

भीमा नदीच्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

उजनी धरणाचा विसर्ग घटल्याने पंढरपूरमधील पुरधोका टाळता आला

सोलापूर जिल्ह्यात ४१५४ सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी; “एक गाव-एक गणपती” चालना

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
Next Article कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

Latest News

लातूरजवळ सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला
महाराष्ट्र August 25, 2025
गुंडांच्या हल्ल्यात मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांना पालकमंत्री शिरसाट यांचे सांत्वन
Top News August 25, 2025
भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी
देश - विदेश August 24, 2025
फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना
देश - विदेश August 24, 2025
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते” – सुप्रिया सुळे यांचा वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र August 24, 2025
गणेशोत्सवासाठी कोकणकडे धावपळ; रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड गर्दी
महाराष्ट्र August 24, 2025
पूरपश्चात व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पाटील यांनी दिले निर्देश
महाराष्ट्र August 24, 2025
नांदेडमध्ये पूरग्रस्तांसाठी खासदार गोपछडे यांनी २० लाख रुपयांची मदत जाहीर
महाराष्ट्र August 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?