Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार

admin
Last updated: 2025/06/22 at 3:39 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

बंगळूरू , 22 जून (हिं.स.) : सोशल मीडियाद्वारे फेक बातम्या पसरवण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. या पसरणाऱ्या खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी आता कर्नाटकातील काँग्रेस सरकार एक नवीन कायदा आणत आहे. यामध्ये खोट्या बातम्या पसरवणाऱ्या व्यक्तीला ७ वर्षांपर्यंतची शिक्षा आणि १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने अलीकडेच एक विधेयक मांडले आहे. खोट्या बातम्या पसरवणाऱ्या व्यक्तीला ७ वर्षांपर्यंतची शिक्षा आणि १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. कर्नाटक सरकारने प्रस्तावित केलेल्या कायद्यात म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीने बनावट बातम्या किंवा चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल. या कायद्यानुसार, जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे खोटे किंवा चुकीचे रिपोर्टिंग करत असाल, किंवा ते संपादित करून ऑडिओ किंवा व्हिडिओ सादर करत असाल, तर या कायद्यानुसार तुमच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल. कर्नाटक सरकारने आणलेल्या या विधेयकाबाबत बोलताना कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे म्हणाले की, चुकीची माहिती पसरवण्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. आज देशातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचे हेच मूळ कारण आहे. लष्करप्रमुखांनी अलीकडेच म्हटले होते की, लष्कराला ५0 ्के वेळा चुकीच्या माहितीचा सामना करण्यात, त्याचे स्पष्टीकरण देण्यात जातो.

खरगे पुढे म्हणतात, निवडणूक आयुक्तांनी म्हटले होते की, ३एम म्हणजेच, पैसा(मनी ), ताकद (मसलं) आणि चुकीची माहिती (मिसइन्फॉरमेशन) लोकशाहीसाठी धोका आहे. पंतप्रधान मोदींनीही स्वतः म्हटले आहे की, चुकीची माहिती लोकशाहीसाठी धोका आहे. भारताचे माजी सरन्यायाधीशही म्हणाले की, बनावट बातम्यांमुळे भारताची लोकशाही धोक्यात येते. खोट्या बातम्या म्हणजे जेव्हा तुम्ही जाणूनबुजून कोणतीही माहिती चुकीच्या पद्धतीने सादर करत असाल, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिमा खराब होत असेल. दुसरीकडे, चुकीची माहिती म्हणजे, तुम्ही जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवत नाही आहात, परंतु तुम्ही पसरवत असलेली माहिती एखाद्या व्यक्तीची प्रतिमा खराब करत आहे. म्हणून, खोट्या बातम्या असोत किंवा चुकीची माहिती असो, दोन्हीही एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा खराब करू शकतात.

You Might Also Like

“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”

ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोवाल पहिल्यांदाच चीनला जाणार

पहलगाम हल्ला : दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना अटक

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र चिंतीत

पाण्यापासून होणार ग्रीन-हायड्रोजनची निर्मिती

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उबाठाच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
Next Article “ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
उबाठाच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?