Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही

admin
Last updated: 2025/06/30 at 5:35 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर, 30 जून (हिं.स.)।

पंढरीच्या पांडुरंगाच्या आषाढी वारी सोहळ्यासाठी यंदा १५ लाखांहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये येतील, असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात दीड ते दोन लाख भाविक मावतात, पण नदी पात्रात पाण्याचा विसर्ग १५ ते २० हजार क्युसेकपर्यंत राहिल्यास वाळवंटात वारकऱ्यांना थांबता येणार नाही. त्यामुळे उजनीतून भीमेत सोडलेला विसर्ग १ जुलैपासून पाच हजार क्युसेक केला जाणार आहे. तर, वीर धरणातून सोडलेला विसर्ग २ जुलैपासून पूर्णपणे बंद केला जाणार आहे.

आषाढी वारीचा सोहळा ६ जुलै रोजी पंढरीत रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त, जिल्हा प्रशासनाने आरोग्य व्यवस्था, दर्शनरांग अशा सर्व बाबींचे नियोजन केले आहे. पण, चंद्रभागा नदीतील विसर्ग सर्वांसाठीच चिंतेचा विषय बनला आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तरीपण सध्या उजनीत १० हजार आणि वीर धरणात सात हजार क्युसेकची आवक सुरू आहे. जुलैअखेर दोन्ही धरणांमध्ये ९० टक्क्यांपर्यंत पाणी असणे अपेक्षित आहे. त्यानुसार सध्या वरून येणारा विसर्ग पाहून दोन्ही धरणांतून नद्यांद्वारे अतिरिक्त पाणी सोडून दिले जात आहे. परंतु, आषाढी वारी काळात चंद्रभागा नदीत पाच हजारापेक्षा जास्त विसर्ग राहणार नाही, याची दक्षता जलसंपदा विभागाकडून घेतली जात आहे.

ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी आता १ व २ जुलैपासून केली जाणार असून, विसर्ग कमी केल्यामुळे चंद्रभागा नदी पात्रातील पूरस्थिती टळणार आहे.

You Might Also Like

ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

इंडोनेशिया : बतिक एअर कंपनीच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला

येत्या ५ तारखेला मोर्चाऐवजी विजयी मेळावा होणार – राज ठाकरे

अझहर महमूद पाकिस्तान क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक

तेलंगणा : केमिकल फॅक्ट्रीत स्फोट, १० जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article crime सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Next Article crime सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
इंडोनेशिया : बतिक एअर कंपनीच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला
देश - विदेश June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?