Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बाजीरावांच्या पुतळ्यासाठी एनडीएचीच जागा योग्य- अमित शाह
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

बाजीरावांच्या पुतळ्यासाठी एनडीएचीच जागा योग्य- अमित शाह

admin
Last updated: 2025/07/04 at 8:26 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

पुणे, 04 जुलै (हिं.स.) : लोकमान्य टिळकांनी पुण्यातून स्वातंत्र्यासाठी एल्गार पुकारला होता. तर 17 व्या शतकात देखील पुण्यात स्वातंत्र्याचा हुंकार निनादला होता. पुणे हे स्वराज्याचे उमगस्थान असून अनेकांना प्रेरणा देणाऱ्या थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्यासाठी एनडीएचीच जागा योग्य असल्याचे प्रतिपादन केंद्रय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. पुण्याच्या खडकवासला येथील एनडीए परिसरात आज, शुक्रवारी बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी शाह म्हणाले की, बाजीराव यांच्या पुतळ्यापासून अनेकांना प्रेरणा मिळेल. काही युद्धनीती कालबाह्य होत नाहीत. सध्याची युद्धनीती आणि बाजीरावांची युद्धनीती यामध्ये साम्य आहे. बाजीरावांनी 20 वर्षांत 41 लढाया लढून त्या सर्व जिंकल्या. पराभव निश्चित मानल्या जाणाऱ्या लढाया बाजीरावांनी जिंकल्या. त्यामुळे त्यांच्यासारखा अजिंक्य सेनापती दुसरा नाही. त्यांचे संपूर्ण आयुष्य लढाया लढण्यात गेले. त्यांनी मिळविलेला विजय कल्पने पलिकडचा होता.मराठा साम्राज्याचे तुकडे झाले तरी, पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेण्याचे महत्त्वाचे काम केले. त्यांनी शेजारच्या संस्थांनातही प्रशासन उत्तम राबविले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची कल्पना केली, तेव्हा भूगोल वेगळा होता. शिवरायांच्या वारसांनी स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. शिवरायांनंतर संभाजी महाराज, ताराराणी यांनी परंपरा पुढे नेली. बुंदेलखंड, तंजावर, गुजरातपासून अफगाणिस्तान, अटक, कटकपर्यंत स्वराजाचा विस्तार केला. निजामविरोधातील पालखेडचा मराठ्यांचा विजय अविस्मरणीय आहे. मी जेव्हा निराश होतो. तेव्हा छत्रपती शिवराय आणि बाजीरावांचा इतिहास आठवतो. बाजीरावांचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. बाजीरावांकडे एक शिपाई आणि तीन घोडे होते असा उल्लेख त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, थोरले बाजीराव पेशवे यांची लढाई जिंकण्यामध्ये एक विशेष रणनिती होती. त्यांचा सेना एका दिवसामध्ये 8 ते 10 किलोमीटर प्रवास करायची. अशा प्रकारची सेना तयार करून त्यांनी आपले युद्ध कौशल्य सिद्ध केले होते. परंतु इंग्रजांनी आणि त्यानंतर काही प्रमाणात स्वकीयांनी इतिहासातील नायकांवर अन्याय केला. किंबहुना आपल्या हिंदवी स्वराज्य आणि मराठ्यांचा इतिहास डिलिट करून टाकला. मुघलानंतर इंग्रज आले. त्यामुळे आपल्य़ा अनेक महानायकांचा विसर पडला. परंतु आज देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इतिहासातील अनेक नायकांचा, योद्ध्यांचा, स्वातंत्र्यसेनानींचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

You Might Also Like

शैलेश जेजुरीकर पीॲंडजीचे पुढचे सीईओ

निवडणुकीसाठी मुदतवाढ मागणार : सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात अर्ज

चीनमध्ये अतिवृष्टीचा कहर: बीजिंगमध्ये ३४ मृत्यू, ८०,००० नागरिकांचे स्थलांतर

वादग्रस्त मंत्री, आमदारांविरोधात कारवाई करा; अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाऊ – अंबादास दानवे यांचा इशारा

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मोफत नोटबुकचे प्रकाशन; विद्यार्थ्यांना वाटपाचा सामाजिक उपक्रम

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; नागपूरच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Next Article ऑपरेशन सिंदूरवेळी भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता – उप लष्करप्रमुख राहुल सिंह

Latest News

पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
देश - विदेश July 30, 2025
crime
सोलापूर : शेतकऱ्याच्या १.०७ लाख रुपयांच्या ट्रॅक्टर अवजारांची चोरी
सोलापूर July 30, 2025
आयुष्यात कधीही भाजपसोबत जाणार नाही” – महादेव जानकरांचा स्पष्ट इशारा
राजकारण July 30, 2025
लष्कर-ए-तैयबाच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नव्हता – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
देश - विदेश July 30, 2025
जम्मू-काश्मीरमध्ये आयटीबीपी जवानांची बस सिंध नदीत कोसळली; सर्व जवान सुखरूप, चालक गंभीर जखमी
देश - विदेश July 30, 2025
पंतप्रधान मोदी २ ऑगस्ट रोजी वाराणसीतून किसान सन्मान निधीचा २०वा हप्ता वितरीत करणार
देश - विदेश July 30, 2025
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरुवारी; सात आरोपींवर निर्णय
महाराष्ट्र July 30, 2025
ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांसाठी यूट्यूबवर बंदी; सोशल मीडियावर सर्वप्रथम असा कायदा
देश - विदेश July 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?