Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “तीन पक्षांचे सरकार वजनानेच पडेल, लगेच भाजपा सत्ता स्थापन करणार”
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

“तीन पक्षांचे सरकार वजनानेच पडेल, लगेच भाजपा सत्ता स्थापन करणार”

Surajya Digital
Last updated: 2020/11/24 at 6:08 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर / पंढरपूर : राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे त्यांच्या वजनानेच पडणार आहे आणि त्यानंतर भाजप लगेचच स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे, असे विधान आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. नव्या सरकारसाठी कोणताही मुहूर्त ठरवलेला नसल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले.

पंढरपूर येथे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता फडणवीस पत्रकारांशी संवाद साधला. असले सरकार चालत नसते, असे सांगताना आम्हाला कोणतीही घाई नाही. तुम्ही फक्त वाट बघा, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आज जेष्ठ नेते दिवंगत सुधाकर परिचारक यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि नंतर भागवताचार्य दिवंगत वा. ना. उत्पात यांच्या घरीही त्यांनी भेट दिली. दरम्यान, कार्तिकी एकादशीसाठी घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात न जाता नामदेव पायरी जवळूनच विठ्ठलाचे दर्शन त्यांनी घेतले. आमदार सुभाष देशमुख, विजय देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, राम सातपुते, रणजीत निंबाळकर, जय सिद्धेश्वर स्वामी, लक्ष्मण ढोबळे यावेळी उपस्थित होते.

* फडणवीसांचा राऊतांना पलटवार

ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर आज छापे टाकले. सरनाईक यांचे पुत्र विहंग यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. ‘ईडी ही तपास यंत्रणा एका राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणे काम करत आहे. ज्यांच्या आदेशावर ईडी कारवाई करत आहे, त्या पक्षाच्या १०० लोकांची यादी मी त्यांच्याकडे पाठवून देतो. त्यांच्यावर कारवाई करून दाखवा,’ असे आव्हानच संजय राऊत यांनी दिले आहे. त्यावर फडणवीस यांनी पलटवार केला.

* चुकीची कारवाई केली तर कोर्ट सोडेल का?

संजय राऊत यांच्यापेक्षा खालच्या पातळीवर जाऊन आम्हाला बोलता येते. ते वापरतात त्यापेक्षा वाईट शब्द आम्ही वापरू शकतो, मात्र आमची ती संस्कृती नाही, असे सांगताना जी कारवाई होत आहे त्याच्या केवळ भीतीपोटी राऊत बोलत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. चूक नसेल तर कशाला कारवाई होईल आणि अशी चुकीची कारवाई केलीच तर कोर्ट सोडेल का?, असा सवालही फडणवीस यांनी केला. चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यावर काय होते हे अर्णब गोस्वामी प्रकरणात सुप्रीम कोर्टात पाहायला मिळाले आहे, असेही फडणवीस म्हणाले.

You Might Also Like

राजकीय विश्लेषक राजा माने यांना ‘शांतीदूत’ राज्यस्तरीय पुरस्कार

सोलापूर सीईओ जंगम यांनी शिक्षणाधिकार्यांवर चिडून सभागृह सोडले

भीमा नदीच्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

उजनी धरणाचा विसर्ग घटल्याने पंढरपूरमधील पुरधोका टाळता आला

भाजपने राऊत यांच्यावर केली तीव्र टीका; सैन्याच्या अपमानासाठी माफी मागण्याची मागणी

TAGGED: #तीनपक्षांचे #सरकार #वजनानेचपडेल #लगेचभाजपा #सत्ता #स्थापनकरणार #देवेंद्रफडणवीस #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मला ईडीकडून कोणतीही नोटीस आली नाही, कारवाईचा सरनाईकांकडून निषेध
Next Article पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई; माजी मंत्री गायकवाडांचा एनसीपीत प्रवेश

Latest News

भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी
देश - विदेश August 24, 2025
फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना
देश - विदेश August 24, 2025
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते” – सुप्रिया सुळे यांचा वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र August 24, 2025
गणेशोत्सवासाठी कोकणकडे धावपळ; रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड गर्दी
महाराष्ट्र August 24, 2025
पूरपश्चात व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पाटील यांनी दिले निर्देश
महाराष्ट्र August 24, 2025
नांदेडमध्ये पूरग्रस्तांसाठी खासदार गोपछडे यांनी २० लाख रुपयांची मदत जाहीर
महाराष्ट्र August 24, 2025
पालकमंत्री पाटील यांनी पूरबाधितांसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले
महाराष्ट्र August 24, 2025
मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला आग; सर्व ४५ प्रवासी सुरक्षित बचावले
महाराष्ट्र August 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?