जम्मू, 5 जुलै (हिं.स.) :
रामबन
जिल्ह्यात 5 बसची टक्कर होऊन सुमारे ३६ अमरनाथ यात्रेकरू जखमी झाले आहेत. या बस
जम्मू भगवती नगरहून दक्षिण काश्मीरमधील पहलगाम बेस कॅम्पला जाणाऱ्या ताफ्याचा भाग
होत्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी
८ वाजता जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील चंद्रकूटजवळ हा अपघात झाला.
ताफ्यातील एका बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे ही टक्कर झाली.
रामबनचे
उपायुक्त मोहम्मद अल्यास खान म्हणाले, “पहलगामच्या ताफ्यातील शेवटच्या वाहनाने नियंत्रण गमावले आणि ते
चंद्रकोट लंगर स्थळी अडकलेल्या वाहनांना धडकले. ज्यामुळे चार वाहनांचे नुकसान झाले आणि ३६ प्रवासी जखमी झाले.”
घटनास्थळी आधीच उपस्थित असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनी जखमींना रामबन जिल्हा
रुग्णालयात दाखल केलेअसे
त्यांनी सांगितले.
जम्मू
आणि काश्मीर जिल्हा रुग्णालयातील रामबनचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहम्मद
रफी म्हणाले, ‘अमरनाथ
यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या एका बसची दुसऱ्या बसशी टक्कर झाली.
एकूण ३६ जखमी रुग्ण आमच्याकडे आले. सर्व रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले आहेत, आम्ही कोणालाही इतर कोणत्याही
रुग्णालयात जाण्यास सांगितलेले नाही.