अमरावती, 4 मे (हिं.स.)।
बी. टी. कापसाच्या बियाण्यांची विक्री १५ मे नंतरच करण्याच्या सूचना कृषी विभागाने विक्रेत्यांना दिल्या आहेत. यापूर्वी बियाण्यांची विक्री केल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांनीही १ जूननंतरच पेरणी करावी. असा सल्ला दिला आहे.कोरडवाहू पट्ट्यात कापूस हे मुख्य पीक आहे. एकूण पेरणीक्षेत्राच्या तुलनेत सर्वाधिक पेरणी कापसाची केली जाते. शेतीच्या आंतरमशागतीस प्रारंभ झाला असून शेतकरी आगामी हंगामाच्या तयारीस लागला आहे. यंदाच्या हंगामात कापसाखाली अमरावती जिल्ह्यातील २ लाख ४९हजार हेक्टर क्षेत्र पेरणीखाली राहण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी ६ हजार क्विंटल बियाणे लागण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील काही भागात धूळपेरणी करण्यात येते. यावर्षी १५ मे पर्यंत कापसाच्या बियाण्यांच्या विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. विक्रेत्यानी शेतकऱ्यांना १५ मे पूर्वी बियाणे विक्री करू नये, असे आदेश कृषी विभागाने दिले आहेत. सन २०१७ मध्ये खरीप हंगामात कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर झाला होता. त्यानंतर कृषी विभागाने २०१८ ते २०१४ या कालावधीत राबविलेल्या उपाययोजनांमुळे शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी झाला. आगामी हंगामातही शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
हंगाम पूर्व कापूस लागवड झाल्यास शेंदरी बोडअळीच्या जीवनक्रमास पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक आहे ही बाब लक्षात घेता खरीप २०२५ मध्ये शेंदरी बोडअळीच्या प्रादुर्भावास आळा घालण्याकरिता व या अळीचा जीवनक्रम खंडित होण्यासाठी अनेक उपाययोजनांपैकी एक म्हणजे हंगामपूर्व लागवड टाळणे हा आहे. त्यासाठीच कृषी विभानाने शेतकऱ्यांना १ जूननंतर लागवडीचा सल्ला दिला आहे. पेरणी नाही, यासाठी बियाणे हंगामापूर्वी उप होणार नाही, याची दक्षता घेण्यात आहे. त्यामुळेच विक्रेत्यांना १५ मे विक्री करण्यास मनाई आदेश बजावन्यात आला आहे. या मुदतीपूर्वी विक्री झाली संबंधित कंपनी, वितरक व किरक विक्रेत्यांविरुद्ध महाराष्ट्र कापूस बियाने अधिनियम अन्वये कारवाई करण्यचा इशारा दिला आहे. बियाणे पुरवठा व विक्री वेळापत्रक कृषी विभागाने जाहीर केले आहे.